Mumbai Goa National Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अल्टो कार २५ फूट दरीत कोसळली; पाच जण गंभीर जखमी
















मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa National Highway) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात रविवारी रात्री भीषण अपघात (Accident) झाला. मोरवंडे परिसरातील सुरभी हॉटेलजवळ एका अल्टो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्यालगतच्या सुमारे २० ते २५ फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती. मोरवंडे परिसरात पोहोचल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार दरीत जाऊन पडली. अपघाताचा जोर इतका होता की वाहनाचे मोठे नुकसान झाले.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते आणि आपत्कालीन मदत पथकाच्या सदस्यांनी दरीत उतरून बचावकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनीही मदत केली.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जवळील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. वैद्यकीय पथकाने जखमींना प्राथमिक उपचार दिल्यानंतर पुढील उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. वेळेत मदत मिळाल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.



या अपघातात सिद्धी नाईक, रिद्धी नाईक, स्नेहल नाईक, सिद्धेश नाईक आणि तेजस बोरकर हे जखमी झाले आहेत. हे सर्वजण मुंबई आणि ठाणे परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.


अपघातानंतर काही काळ महामार्गावर नागरिकांची गर्दी झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत.










Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी ट्रॅव्हल्सची बस ट्रकवर आदळली, २५ प्रवासी जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला आहे. रविवारी मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ झालेल्या

Jalna Bribe Case : पार्टी सुरू व्हायच्या आधीच वाजले बारा! एसीबीने जालनाच्या तहसीलदारांच्या घरात टाकला छापा

जालना: जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक

Chitra Wagh : डहाणूतील संतापजनक प्रकरणावर चित्रा वाघ आक्रमक; दोन बहिणींवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडलेल्या एका लव्ह जिहादच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या

Nashik TCS Case : नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणात नवा दावा; निदा खानने केला 'त्या' घटनेचा खुलासा

नाशिक : नाशिकमधील एका आयटी कंपनीशी संबंधित कथित लैंगिक छळ (sexual harassment) आणि धर्मांतर प्रकरणाचा (Religious conversion) तपास सुरू

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली