न्यू चंदीगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले आहे. पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजीला सुरुवातीपासूनच दबावात ठेवलं. या सामन्यात भारताकडून मानवने पदार्पण करत अफगाण फलंदाजांना अडचणीत टाकले आहे. त्याने 16 षटकात २१ धावा देत तीन विकेट्स घेतल्या आहेत.भारताने पहिल्या डावात ८ बाद ५६४ धावांवर डाव घोषीत केला.प्रत्युत्तरात अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली.दुसऱ्या दिवसाच खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तानने पाच विकेट्स गमावत ११३ धावा केल्या आहे.ते भारताच्या धावसंख्येपेक्षा ४५१ धावांनी पिछाडीवर आहेत.
गिल-पंतची भागीदारी ठरली निर्णायक
दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने ३ बाद ३६८ धावांपासून केली. कर्णधार शुभमन गिल याने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. त्याने १२६ धावांची खेळी साकारली त्यानंतर तो मोहम्मद सलामच्या चेंडूवर बाद झाला. दुसरीकडे ऋषभ पंत याने आक्रमक फलंदाजी करत ८१ धावा केल्या.दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचून भारतीय डावाला आणखी मजबुती दिली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याने नाबाद अर्धशतक झळकावत भारताची धावसंख्या ५६४ धावांपर्यंत पोहोचवली.
मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी तुफान फटकेबाजी करून अनेकांचे लक्ष वेधून घेणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (१५ वर्षे) पुन्हा चर्चेत आला ...
मानवचे स्वप्नवत पदार्पण
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानला भारतीय वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला धक्के दिल्यानंतर मानवने फिरकीची जादू हळू हळू दाखवली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने अचूक गोलंदाजी करीत अफगाणिस्तानच्या मधल्या फळीची वाताहात केली. त्याने अफगाणस्तानच्या तीन फलंदाजांना बाद केले. मानवच्या प्रभावी गोलंदाजीमुळे सामन्यावरील भारताची पकड घट्ट झाली आहे.
रहमत शाहची एकाकी झुंज
एकीकडे विकेट्स पडत असताना अनुभवी रहमत शाह मात्र खंबीरपणे उभा राहिला. तो ४३ धावांवर नाबाद असून अफगाणिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दुसऱ्या टोकाला त्याला पुरेशी साथ मिळालेली नाही.
NEW YORK : फुटबॉल चाहत्यांसाठी एक मोठी बातमी! फिफा (FIFA) आणि अॅडिडासने २०२६ च्या आगामी विश्वचषकासाठी अधिकृत फुटबॉल 'ट्रायोंडा' (Trionda) अधिकृतपणे लाँच केला आहे. ...
भारत विजयाच्या दिशेने
पहिल्या डावातील प्रचंड धावसंख्या त्यानंतर मोठी सुरुवात करुन देण्यात भारतीय संघाला यश आले आहे.तिसऱ्या दिवशी भारताचे लक्ष्य अफगाणिस्तानचा उर्वरित डाव लवकर आटोपून मोठी आघाडी मिळवण्याकडे असेल.सध्या सामन्याची सर्व सूत्रे भारताच्या हातात असून पदार्पणवीर मानवची प्रभावी गोलंदाजी भारतासाठी फायद्याच ठरली आहे.