SHREYAS IYER : भारतीय क्रिकेट संघाच्या टी२० टीमचे नेतृत्व लवकरच श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला असला, तरी आता बीसीसीआय नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे. सूर्यकुमार यादवचा सध्याचा खराब फॉर्म आणि वाढते वय पाहता, बीसीसीआय आता श्रेयस अय्यरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत आहे.
PANJAB : मुल्लांपूर (नवी चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ऐतिहासिक एकमेव कसोटी ...
श्रेयस अय्यरसमोर असणारी ३ प्रमुख आव्हाने
१. संघ निवडीचे संतुलन आणि वैभव सूर्यवंशीचा समावेश: आयपीएल २०२६ मध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला टीम इंडियात स्थान देण्याची मागणी जोर धरत आहे. भारताकडे आधीच ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांसारखे अनुभवी पर्याय उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, वैभवला संघात स्थान दिल्यास त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये नेमक्या कोणत्या क्रमांकावर खेळवायचे आणि कुणाला बाहेर बसवायचे, हे समीकरण जुळवणे श्रेयससाठी मोठे आव्हान असेल.
२. प्रमुख खेळाडूंचा खराब फॉर्म: भारतीय संघातील अनेक मॅच-विनर खेळाडू सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहेत. शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचे आयपीएल २०२६ मधील प्रदर्शन फारसे आश्वासक राहिले नाही. एवढेच नव्हे तर, मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव दिसून आला आहे. हे खेळाडू जर आगामी मालिकांमध्ये लयीत आले नाहीत, तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
३. विजयाचा वारसा टिकवण्याचे दडपण: भारतीय टी२० संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. २०२३ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताला टी२० मालिकेत एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. गेल्या १६ मालिकांपैकी १५ मालिका भारत जिंकला असून, एक मालिका बरोबरीत सुटली आहे. हा अजेय राहण्याचा लौकिक टिकवून ठेवण्याचे मोठे दडपण श्रेयस अय्यरवर असेल. जर हा रेकॉर्ड बिघडला, तर श्रेयसवर टीकेची झोड उठू शकते.





