PM Suryaghar Yojana : सौर ऊर्जेत महाराष्ट्राची दमदार झेप ! पीएम सूर्यघर योजनेत ८ राष्ट्रीय पुरस्कार; जळगाव देशात टॉप-१० मध्ये

PM Suryaghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने (Maharashtra) देशभरात आपली वेगळी छाप उमटवली आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून राज्याला तब्बल आठ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यानेही मोठी कामगिरी करत देशातील अव्वल १० जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवले आहे.



सौर ऊर्जेत महाराष्ट्राची दमदार झेप


सौर ऊर्जा (Solar energy) क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून राज्याला तब्बल आठ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवन (Atal Akshay Urja Bhavan ) येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांच्या हस्ते महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. विशेष बाब म्हणजे, इतर कोणत्याही राज्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर पुरस्कार मिळाले नसल्याने महाराष्ट्राच्या सौर ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या संकल्पनेतून फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झालेल्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा (PM Suryaghar Yojana ) उद्देश देशभरातील एक कोटी घरांवर छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Power Project) उभारण्याचा आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा उपलब्ध करून देण्याबरोबरच वीजबिलात मोठी बचत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत देशातील ४० लाखांहून अधिक कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.



दोन वर्षांत ६ लाख सौर ऊर्जा प्रकल्प


महाराष्ट्रात महावितरणच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत ६ लाख ५ हजार ८४७ घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून, या कामगिरीच्या जोरावर राज्याने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. गुजरात पहिल्या, तर उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे.


राज्यातील जिल्हास्तरावर जनजागृती मोहीम, अर्ज प्रक्रियेतील सुलभता आणि तांत्रिक मदतीमुळे योजनेला वेग मिळाल्याचे चित्र आहे. देशातील सर्वाधिक सौर प्रकल्प उभारलेल्या टॉप-१० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल तीन जिल्ह्यांनी स्थान मिळवले आहे. नागपूर जिल्हा ८९ हजार २५५ प्रकल्पांसह देशात दुसऱ्या स्थानावर, तर जळगाव जिल्हा ४२ हजार ५७४ प्रकल्पांसह नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यानेही ४२ हजार १५१ प्रकल्पांसह दहावे स्थान मिळवले आहे.



महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर


दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘मंथ ऑफ सोलर’ मोहिमेतही महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली. मे महिन्यात राज्यात ६५ हजार ७८६ अर्ज प्राप्त झाले, तर ५४ हजार २४६ घरांवर सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. या दोन्ही वर्गवारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर राहिला.


विशेष म्हणजे, २९ मे रोजी एका दिवसात सर्वाधिक सौर प्रकल्प बसविण्याच्या मोहिमेत महाराष्ट्राने ४ हजार ७०० घरांवर प्रकल्प उभारून देशात प्रथम क्रमांक मिळवला. याशिवाय ६९ हजार १५६ सौर प्रकल्पांची तपासणी आणि ४१३ अधिकृत पुरवठादारांची नोंदणी करूनही महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर आपली मजबूत उपस्थिती सिद्ध केली आहे.

Comments
Add Comment

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे

Pune Jagannath Rath Yatra 2026 : पुणेकरांनो अलर्ट! जगन्नाथ रथयात्रेमुळे उद्या 'या' प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन; घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या म्हणजेच रविवारी १९ जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातील

NEET Results 2026 : NEET निकालावर पुन्हा संशय! अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश

बीड : देशभरात NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी