PM Suryaghar Yojana : सौर ऊर्जेत महाराष्ट्राची दमदार झेप ! पीएम सूर्यघर योजनेत ८ राष्ट्रीय पुरस्कार; जळगाव देशात टॉप-१० मध्ये

PM Suryaghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने (Maharashtra) देशभरात आपली वेगळी छाप उमटवली आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून राज्याला तब्बल आठ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यानेही मोठी कामगिरी करत देशातील अव्वल १० जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवले आहे.



सौर ऊर्जेत महाराष्ट्राची दमदार झेप


सौर ऊर्जा (Solar energy) क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून राज्याला तब्बल आठ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवन (Atal Akshay Urja Bhavan ) येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांच्या हस्ते महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. विशेष बाब म्हणजे, इतर कोणत्याही राज्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर पुरस्कार मिळाले नसल्याने महाराष्ट्राच्या सौर ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या संकल्पनेतून फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झालेल्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा (PM Suryaghar Yojana ) उद्देश देशभरातील एक कोटी घरांवर छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Power Project) उभारण्याचा आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा उपलब्ध करून देण्याबरोबरच वीजबिलात मोठी बचत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत देशातील ४० लाखांहून अधिक कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.



दोन वर्षांत ६ लाख सौर ऊर्जा प्रकल्प


महाराष्ट्रात महावितरणच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत ६ लाख ५ हजार ८४७ घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून, या कामगिरीच्या जोरावर राज्याने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. गुजरात पहिल्या, तर उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे.


राज्यातील जिल्हास्तरावर जनजागृती मोहीम, अर्ज प्रक्रियेतील सुलभता आणि तांत्रिक मदतीमुळे योजनेला वेग मिळाल्याचे चित्र आहे. देशातील सर्वाधिक सौर प्रकल्प उभारलेल्या टॉप-१० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल तीन जिल्ह्यांनी स्थान मिळवले आहे. नागपूर जिल्हा ८९ हजार २५५ प्रकल्पांसह देशात दुसऱ्या स्थानावर, तर जळगाव जिल्हा ४२ हजार ५७४ प्रकल्पांसह नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यानेही ४२ हजार १५१ प्रकल्पांसह दहावे स्थान मिळवले आहे.



महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर


दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘मंथ ऑफ सोलर’ मोहिमेतही महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली. मे महिन्यात राज्यात ६५ हजार ७८६ अर्ज प्राप्त झाले, तर ५४ हजार २४६ घरांवर सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. या दोन्ही वर्गवारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर राहिला.


विशेष म्हणजे, २९ मे रोजी एका दिवसात सर्वाधिक सौर प्रकल्प बसविण्याच्या मोहिमेत महाराष्ट्राने ४ हजार ७०० घरांवर प्रकल्प उभारून देशात प्रथम क्रमांक मिळवला. याशिवाय ६९ हजार १५६ सौर प्रकल्पांची तपासणी आणि ४१३ अधिकृत पुरवठादारांची नोंदणी करूनही महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर आपली मजबूत उपस्थिती सिद्ध केली आहे.

Comments
Add Comment

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य

Fake cotton seeds : खरीपच्या तोंडावर मोठा घोटाळा उघड ! जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Fake cotton seeds : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे.

Minister Pratap Sarnaik : एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना 'नो एन्ट्री'; मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

- अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्यव्यापी धडक मोहीम मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'एसटी'

Maharashtra Monsoon 2026 : मान्सून महाराष्ट्राच्या दारात! पुढील ४८ तास निर्णायक; अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

मुंबई : राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून नैऋत्य मान्सून

El Nino : एल निनोची धास्ती! दुष्काळाच्या भीतीने शेतकरी अस्वस्थ; मदतीसाठी हेल्पलाइनवर कॉल्समध्ये ६२% वाढ

मुंबई : राज्यात यंदा ‘एल निनो’च्या (El Nino) संभाव्य प्रभावामुळे पावसाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून,