Minister Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या शिष्टाईला यश

'उबाठा'चे उमेदवार बाळ माने यांची माघार; कोकण विधानपरिषदेची निवडणूक होणार बिनविरोध


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास शिल्लक राहिलेले असतानाच कोकणच्या राजकारणात मोठा 'ट्विस्ट' पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचे (उबाठा) अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे भाजप संपर्क प्रमुख नितेश राणे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे हा राजकीय चमत्कार घडला असून, बाळ माने थेट नितेश राणे यांच्यासोबतच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या. माने यांच्या माघारीमुळे आता कोकण विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, हा उबाठा गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.



अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी दुपारी स्वतः नितेश राणे हे बाळ माने यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तेथे माने यांनी अधिकृतपणे माघार घेतल्याचे जाहीर केले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफुशीवर नाराजी व्यक्त केली. माने म्हणाले, "उमेदवारी अर्ज भरताना सूचक म्हणून मला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सह्या मिळाल्या नाहीत. मविआतील घटक पक्षांकडून मला कोणतीही राजकीय साथ लाभली नाही. पक्षाचे मतदार असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींपैकी काही मंडळी चक्क तीर्थयात्रेला निघून गेली आहेत, त्यामुळे मला मतदारच भेटत नव्हते. अशा परिस्थितीत मी काय करणार? मला या निवडणुकीत होणारा संभाव्य घोडेबाजार टाळायचा होता, म्हणूनच मी नाईलाजाने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे."

माने यांनी देवाभाऊंच्या शब्दाचा मान राखला - नितेश राणे


या संपूर्ण घडामोडींवर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी बाळ माने यांच्या भूमिकेचे स्वागत केले. ते म्हणाले, "मी येथे महायुतीचा एक अधिकृत प्रतिनिधी आणि कार्यकर्ता म्हणून आलो आहे. बाळ माने हे माजी आमदार असून अनुभवी नेते आहेत, त्यांना बरे-वाईट सर्व समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहता राज्याला पुढे नेण्यासाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही हे आता सर्वांना पटू लागले आहे. माने यांनी आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवला आणि मविआतील परिस्थिती ओळखून हा अत्यंत समजूतदार निर्णय घेतला," असे राणे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

TMC political crisis 20 MP likely to join BJP : ममता बॅनर्जींना मोठा झटका! ६० आमदारांनंतर आता २० खासदार भाजपाच्या वाटेवर

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणातून अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीतील दारुण

Sunil Tatkare: राष्ट्रवादीचा यंदाचा वर्धापनदिन अजितदादांना समर्पित

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात होणार कार्यक्रम मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस

French Open 2026 : वर्ल्ड नं. 1 आर्यना सबालेंका स्पर्धेबाहेर; डायना श्नाइडरची ऐतिहासिक कामगिरी

Paris: फ्रेंच ओपन 2026 मध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. महिला एकेरीतील विजेतेपदाची प्रबळ दावेदार आणि जागतिक

Parali Crime News : परळी हादरली! मित्राची चक्क दगडाने ठेचून हत्या; रेल्वे रुळावर मृतदेह ठेवून आत्महत्येचा रचला बनाव

बीड : परळी परिसरात पैशांच्या किरकोळ देवाणघेवाणीच्या वादातून ३६ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात

Nashik : सिंहस्थाच्या ध्वजस्तंभ शिलान्यास सोहळा ११ जूनला

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन

Nashik Crime : वकिलावरील प्राणघातक हल्ल्यातील मुख्य सूत्रधार वर्षभरानंतर गजाआड

Nashik Crime : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांविरुद्ध कडक मोहीम उघडण्याचे आदेश पोलीस