Two Eclipses In 15 Days : एकाच महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण; ऑगस्ट २०२६ मध्ये दुर्मिळ खगोलीय योग!

मुंबई : वैज्ञानिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन मोठ्या खगोलीय घटना ऑगस्ट २०२६ मध्ये अनुभवायला मिळणार आहेत. अवघ्या दोन महिन्यांनंतर १५ दिवसांच्या अंतराने सूर्यग्रहण (Solar Eclipse) आणि चंद्रग्रहण (Lunar eclipse) एकाच महिन्यात घडणार आहे. १२ ऑगस्ट रोजी होणारे सूर्यग्रहण आणि २८ ऑगस्टचे चंद्रग्रहण जगातील विविध भागांतून पाहता येणार असून, खगोलप्रेमी आणि संशोधकांसाठी हा विशेष काळ ठरणार आहे.


ऑगस्ट २०२६ मध्ये पंधरा दिवसांच्या अंतराने होणारी ही दोन्ही ग्रहणं केवळ योगायोग नसून त्यामागे अचूक खगोलीय गणित कार्यरत असते. पूर्वीच्या काळात ग्रहणांकडे भीती आणि अंधश्रद्धेच्या नजरेतून पाहिले जात असे. मात्र आधुनिक विज्ञानानुसार ग्रहण या सावल्यांमुळे घडणाऱ्या नैसर्गिक आणि पूर्वनियोजित खगोलीय घटना आहेत. वैज्ञानिक भाषेत या कालावधीला ‘इक्लिप्स सीजन’ (Eclipse Season) असे म्हटले जाते.



पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते, तर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या तुलनेत सुमारे ५ अंशांनी झुकलेली असल्यामुळे प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण आणि प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. ज्या ठिकाणी या दोन कक्षा एकमेकांना छेदतात, त्या बिंदूंना ‘नोड्स’ (Nodes) म्हणतात. चंद्र जेव्हा या नोड्सच्या जवळून प्रवास करतो, तेव्हा ग्रहण घडण्याची शक्यता निर्माण होते. हा अनुकूल कालावधी सुमारे ३४.५ दिवसांचा असतो आणि त्यालाच ‘इक्लिप्स सीजन’ म्हणतात. त्यामुळेच एकाच महिन्यात १५ दिवसांच्या अंतराने सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अनुभवायला मिळते.


या दिवशी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. चंद्र पृथ्वीच्या तुलनेत अशा स्थितीत येतो की तो सूर्याचा प्रकाश पूर्णपणे झाकून टाकतो. या घटनेला ‘खग्रास सूर्यग्रहण’ (Total Solar Eclipse) असे म्हणतात. वैज्ञानिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची खगोलीय घटना मानली जाते.


सूर्याचा सर्वात बाहेरील थर ‘कोरोना’ (Corona) म्हणून ओळखला जातो. सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे हा थर सामान्यतः दिसत नाही. मात्र खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत असल्याने शास्त्रज्ञांना सौर कोरोनाचा प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे आणि विविध उपकरणांच्या साहाय्याने सखोल अभ्यास करता येतो. सूर्यग्रहणाच्या काळात काही मिनिटांसाठी दिवसाही अंधाराचे वातावरण निर्माण होते. विविध वैज्ञानिक अभ्यासांनुसार या काळात तापमानात अचानक घट नोंदवली जाते. तसेच पृथ्वीच्या आयनोस्फियर (Ionosphere) थरामधील रेडिओ लहरींच्या हालचालींवरही त्याचा परिणाम होतो.



सूर्यग्रहणानंतर नेमके पंधरा दिवसांनी पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येणार आहे. त्यामुळे ‘खंडग्रास चंद्रग्रहण’ (Partial Lunar Eclipse) घडेल. २८ ऑगस्ट रोजी होणारे हे ग्रहण ‘दीप खंडग्रास’ (Deep Partial Lunar Eclipse) स्वरूपाचे असेल, कारण चंद्राचा तब्बल ९६ टक्के भाग पृथ्वीच्या गडद सावलीत म्हणजेच ‘अम्ब्रल शॅडो’ (Umbral Shadow) मध्ये झाकला जाईल.


हे पूर्ण चंद्रग्रहण नसले तरी चंद्राचा शहाण्णव टक्के भाग सावलीत गेल्यामुळे तो गडद तांबूस किंवा काजळीसारखा दिसू शकतो. विज्ञानात या प्रक्रियेला ‘रेले स्कॅटरिंग’ (Rayleigh Scattering) असे म्हटले जाते. पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करताना सूर्यप्रकाशातील तांबड्या रंगाच्या किरणांचे अपवर्तन होऊन ते चंद्रावर पडतात आणि त्यामुळे चंद्राला हा वैशिष्ट्यपूर्ण रंग प्राप्त होतो.

Comments
Add Comment

Bihar Hospital Fire : बिहारमधील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग; चार रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

बिहार : बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) (ICU) लागलेल्या भीषण

Delhi's Malviya Nagar Fire : दिल्लीतील अग्नितांडवात एकाच कुटुंबातील ८ जणांचा दुर्दैवी अंत

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील फ्लोरिश स्टे बी अँड बी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत

सरकारी नोकरी हवीय? मग 'ही' रेल्वे भरतीची संधी चुकवू नका

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) टेक्निशियन पदांसाठी मोठी

दिल्लीतील हॉटेलमध्ये भीषण आग; अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी एका हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये भीषण आग (Massive Fire)

Bangladeshi Nationals Detained In Ahmedabad : गुजरातमध्ये अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; अहमदाबादमधून १३१ बांगलादेशी नागरिक ताब्यात, १६० हून अधिक संशयितांची चौकशी सुरू

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी मोठी

India-Nepal Border Issue : भारत – नेपाळ सीमा प्रश्नावर भारताने नाकारला तृतीय पक्षाचा सहभाग

- युरोपीयन युनियन व पाकिस्तान संयुक्त निवेदन भारताने फेटाळले नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA)