मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पुष्पा पार्कजवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ही घटना घडली. भरधाव बेस्ट बसने (BEST Bus) रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिल्याने काही वाहनांचे मोठे नुकसान झाले. Malad Bus Accident

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. संबंधित बेस्ट बस आपली नियमित फेरी पूर्ण करून डेपोकडे परत जात होती. त्यावेळी अचानक बसचे नियंत्रण बिघडल्याने तिने समोर असलेल्या काही वाहनांना धडक दिली. या अपघातात एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाल्याचे दिसून आले.



अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत झाली. अनेक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि कार्यालयीन वेळ असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.



घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नुकसानग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. काही वेळानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून नेमके कारण काय होते याचा तपास सुरू आहे.

या घटनेनंतर बेस्ट प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नसून, अपघातामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
Comments
Add Comment

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Sumantrao Pendharkar : 'विको'ला जागतिक ओळख देणारे उद्योगरत्न सुमंतराव पेंढरकर यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि

Maharashtra Vidhan Bhavan : विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबई : महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर

Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार 'जेन-झीं'शी संवाद

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे