फोन घेताना सावधान ! 'जुने फोन नवे करून' विक्री ; कुठे सुरु आहे धक्कादायक प्रकार ?

जामखेड : जामखेड शहरात सध्या मोबाईल ग्राहकांची आर्थिक लूट आणि फसवणूक करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात मोबाईल खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांची अत्यंत पद्धतशीरपणे आर्थिक लूट करणारी एक मोठी साखळी सक्रिय झाली आहे. जुने मोबाईल नवे करून विकणे आणि GST बिलात करचोरी करणे हे प्रकार सुरू असतानाच, आता मोबाईल फायनान्स' (हप्त्यावर मोबाईल) च्या नावाखाली ग्राहकांचे खिसे कापण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


विविध फायनान्स कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करत आणि वेगवेगळ्या खर्चांचे आमिष दाखवून ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा रुपये उकळले जात असल्याने जामखेडकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.



नेमका प्रकार कसा घडतो ?


माहितीनुसार, काही मोबाईल विक्रेते अत्यंत कमी किमतीत जुने, भंगार किंवा स्क्रॅच पडलेले ब्रँडेड मोबाईल गोळा करतात. या मोबाईलचे कव्हर, डिस्प्ले आणि बॅटरी बदलून त्यांना बाहेरून हुबेहूब नव्यासारखे रूप दिले जाते. त्यानंतर, कोणत्याही सील नसलेल्या किंवा बनावट बॉक्समध्ये हे मोबाईल पॅक करून, ग्राहकांना "कंपनी ऑफर" किंवा "डिस्काउंट" चे आमिष दाखवून नवीन फोनच्या किमतीत विकले जात आहेत.


महागडा मोबाईल रोख पैशात घेणे शक्य नसल्याने अनेक मध्यमवर्गीय व तरुण ग्राहक 'झिरो डाऊन पेमेंट' किंवा 'सुलभ हप्त्यांवर' मोबाईल घेण्यास पसंती देतात. ग्राहकांच्या याच गरजेचा गैरफायदा काही मोबाईल शॉपी चालक घेत आहेत. फायनान्स कंपनीचे अधिकृत प्रोसेसिंग शुल्क केवळ काही रुपये असताना, ग्राहक अशिक्षित किंवा घाईत आहे हे पाहून त्यांच्याकडून फाईल चार्ज, लॉगिन फी आणि सर्व्हिस चार्जच्या नावाखाली १ ते ३ हजार रुपये अतिरिक्त उकळले जात आहेत.



इन्शुरन्स काढणे सक्तीचे


"फायनान्स करायचे असेल तर मोबाईलचा इन्शुरन्स काढणे सक्तीचे आहे, नाहीतर लोन मंजूर होणार नाही असे खोटे सांगून ग्राहकांच्या माथी महागडे आणि बोगस इन्शुरन्स मारले जात आहेत. 'झिरो परसेंट इंटरेस्ट' सांगून प्रत्यक्षात ग्राहकांचे उरलेले पैसे वेगवेगळ्या हिडन चार्जेसमध्ये लावून मोबाईलची मूळ किंमत थेट दीडपटीवर नेली जात आहे.



''सर्व्हर डाऊन आहे, बिल व्हॉट्सॲपवर पाठवतो"


जेव्हा एखादा ग्राहक जागृतपणे पक्क्या बिलाची मागणी करतो, तेव्हा त्याच्याकडून १८% GST चे पैसे रोख किंवा ऑनलाईन घेतले जातात. मात्र, बिल देण्याच्या वेळी "सर्व्हर डाऊन आहे," ऑपरेटर नाही" किंवा "व्हॉट्सॲपवर पाठवतो" अशी थातुरमातुर कारणे देऊन ग्राहकांना केवळ एका कच्च्या कागदावर किंवा मोकळ्या पावतीवर लिहून दिले जाते. ग्राहकांकडून वसूल केलेला हा GST चा पैसा थेट दुकानदारांच्या खिशात जात असून, हा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणारा करचोरीचा मोठा घोटाळा आहे.



गरिबांच्या रक्तापाण्याची कमाई लुटण्याचा प्रकार


जामखेडमधील हा प्रकार म्हणजे थेट गरिबांच्या रक्तापाण्याची कमाई लुटण्याचा प्रकार आहे. या प्रकारामुळे प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचीही बदनामी होत आहे. त्यामुळे वस्तू व सेवा कर विभाग, ग्राहक मंच आणि स्थानिक पोलिसांनी या आर्थिक लुटीची गंभीर दखल घेऊन अशा बोगस मोबाईल शॉपीजवर आणि फायनान्स एजंट्सवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


अशा काही ठराविक दुकानदारांना अगोदरही ताकीद दिली होती. पण नफेखोरी आणि लवकर श्रीमंत होण्यासाठी असे काही व्यावसायिक जामखेड मोबाईल मार्केट चे नाव खराब करत आहेत. ग्राहकांना जागृत होण्याची गरज आहे. याबाबत आम्ही लवकरच असोसिएशन कडून बोर्ड लावून ग्राहकांना या बाबतीत सजग करणार आहोत असे जामखेड तालुका मोबाईल असोसिएशन सुनील जगताप यांनी सांगितले आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी