Mahayuti : महायुतीमधील बंडखोरांनी तातडीने अर्ज मागे घ्यावेत

रवींद्र चव्हाणांचे आवाहन; एकत्र पत्रकार परिषद घेत महायुतीने जाहीर केली अधिकृत उमेदवारांची यादी


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीत (Elections) बंडखोरांनी डोकेदुखी वाढवल्यामुळे महायुतीने अखेर अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या व्यतिरिक्त अर्ज दाखल केलेल्या सर्वांनी माघार घ्यावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी बुधवारी केले. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना उपनेते राहुल शेवाळे आदी उपस्थित होते.


जागावाटपाच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये काही जागांवरून नाराजी असणे किंवा उमेदवारीची तीव्र इच्छा असणे स्वाभाविक आहे; मात्र अशा बंडखोरीमुळे महायुतीच्या एकजुटीला धक्का पोहोचू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून सर्व बंडखोर नेत्यांशी वैयक्तिक संवाद साधून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.



या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्ये झालेल्या अंतिम तडजोडीनुसार भाजप (BJP) ११ जागांवर, शिवसेना (Shivsena) ४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) २ जागांवर निवडणूक (Election) लढवत आहे. पक्षाच्या आदेशानुसारच सर्व उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले असून, महायुती सर्व १७ जागांवर पूर्ण ताकतीने आणि समन्वयाने लढणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. काही मतदारसंघांमध्ये एकाच जागेवर महायुतीमधील दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी अर्ज भरल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ ४ जूनच्या अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपूर्वी पूर्णपणे सोडवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, स्थानिक पातळीवरील बंडखोरांना शांत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांमार्फत चर्चा केली जात आहे.


चव्हाण म्हणाले, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बंडखोर उमेदवारांना विनंती आहे की, ही निवडणूक आगामी काळातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्वांनी अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. महायुतीमधील कोणतीही अंतर्गत बंडखोरी मतदानाच्या निकालावर परिणाम करणार नाही आणि सर्व जागांवर महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Shalarth ID Scam : काेट्यवधींच्या मालमत्तेवर टाच बसणार ! १६० कोटींच्या अपहारातून घेतलेली मालमत्ता ‘शासनजमा’ होणार

Shalarth ID Scam : नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील कोट्यवधींच्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात महत्त्वाची माहिती समोर येत

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि

FIFA World Cup 2026 : एमबाप्पेने रचला इतिहास ! फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये मोडले पाच मोठे विक्रम !

बॉस्टन : फिफा विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात आहे. मागील अनेक स्पर्धांच्या तुलनेत या वर्षीची स्पर्धा ऐतिहासिक

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणायला तयार!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; त्यांनी रामरक्षेची किमान दोन पाने तरी स्वतः वाचावीत मुंबई : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)

Dhar Bhojshala supreme court : धार भोजशाळा वाद : 'प्रकरण अत्यंत संवेदनशील', अंतिम निकाल येईपर्यंत नमाजसाठी पर्यायी जागेची व्यवस्था - सर्वोच्च न्यायालय

मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाळा परिसराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण अंतरिम