रायगड सज्ज! शिवराज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनासाठी ५ आणि ६ जूनला भव्य सोहळा



















छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर ५ आणि ६ जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आहे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त प्रशासन सज्ज झाले आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून अनेक स्वयंसेवक आणि समित्यांचा यात सहभाग आहे.

या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड परिसरात विशेष तयारी करण्यात आली आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा, सुरक्षा यंत्रणा तसेच मार्गदर्शन केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडावर होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व तयारी पूर्णत्वाकडे नेली आहे.

पहिल्या दिवशी ५ जून रोजी पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर रायगड चढाई, गडपूजन, पारंपरिक युद्धकलेची प्रात्यक्षिके, शाहिरी कार्यक्रम, गोंधळ आणि भजन-कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशी ६ जून रोजी मुख्य राज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. ध्वजारोहण, शिवछत्रपतींच्या पालखीचे आगमन, उत्सवमूर्तीचा अभिषेक, सुवर्णमुद्रांचा अभिषेक आणि पालखी सोहळा हे कार्यक्रम यावेळी पार पडतील. तसेच शिवभक्तांना संबोधित करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करून सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. स्वराज्याच्या इतिहासाला उजाळा देणारा हा सोहळा यंदाही महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

 










Comments
Add Comment

Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान

Weather Station : प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक

Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

बीडमध्ये हॉटेल चालकाची हत्या Beed Murder Case : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका २५ वर्षीय हॉटेल चालकाची चाकूने

Devendra Fadnavis : ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 फडणवीस सरकारचा नवा विक्रम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार ७५२ कोटींची तरतूद मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या

Ambenali Ghat: २०० फूट दरीत कोसळलेल्या तरुणाला मिळाली 'नवसंजीवनी'; स्थानिक ट्रेकर्सचे धाडसी ऑपरेशन!

महाबळेश्वर (सातारा) : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि घनदाट जंगलासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या आंबेनळी

Devendra Fadnavis : महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार मुंबई : "राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून