Jalgaon : जळगावात एफडीएकडून कारवाईचा मोठा धडाका ! पाच हॉटेलांचे परवाने निलंबित

FDA takes action in Jalgaon : जळगाव जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) अर्थात एफडीएने मोठी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही महिन्यांत जिल्हाभर राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत अस्वच्छ हॉटेल्स, विनापरवाना अन्न व्यवसाय, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल पाच हॉटेल व्यावसायिकांचे परवाने निलंबित (Licenses Suspended) करण्यात आले असून, गुटख्याच्या २२ कारवायांमध्ये २८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच दूषित दुधाचाही मोठा साठा नष्ट करण्यात आला आहे.



२८ संशयितांना अटक


एफडीएच्या विशेष मोहिमेत प्रतिबंधित गुटख्याविरोधातील कारवाई सर्वाधिक ठरली. जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकलेल्या २२ धाडींमध्ये ३८ लाख १३ हजार ४९३ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणांमध्ये २८ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गुटख्याची अवैध साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.



५०४ लिटर दूध नष्ट 


याशिवाय नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या विविध अन्नपदार्थांवरही कारवाई करण्यात आली. प्रिझर्व्ह फूड, तूप, बेकरी उत्पादने, सुटे खाद्यतेल, मिठाई आणि दूध यांसंदर्भातील १६ प्रकरणांमध्ये १६ लाख ३ हजार ९१६ रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू असून, अहवालानुसार संबंधितांवर पुढील कारवाई होणार आहे.तपासणीदरम्यान निकृष्ट आणि दूषित आढळलेल्या ५०४ लिटर दुधाचा साठा या कारवाईत नष्ट करण्यात आला आहे. या दुधाची अंदाजे किंमत २६ हजार ४८७ रुपये इतकी असल्याची माहिती विभागाने दिली. दूषित दूध बाजारात पोहोचण्यापूर्वीच नष्ट केल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा संभाव्य धोका टळल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.



५ लाखांहून अधिक दंड वसूल


अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवरही एफडीएने कारवाईचा बडगा उगारला असून विनापरवाना अन्न व्यवसाय, उघड्यावर अन्न विक्री तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७७ प्रकरणांमध्ये ५ लाख २४ हजार रुपयांचा तडजोड दंड वसूल करण्यात आला आहे. तर स्वयंपाकघरातील अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे पाच हॉटेल व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले. आवश्यक सुधारणा केल्यानंतरच त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले.



सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई


ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि स्वच्छ अन्न उपलब्ध करून देणे ही प्रत्येक अन्न व्यावसायिकाची कायदेशीर जबाबदारी असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विभागाकडून पुढील काळातही नियमित तपासण्या सुरू राहणार असून तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्यास संबंधितांना नोटीस देण्यात येईल. नोटिशीत नमूद केलेल्या मुदतीत सुधारणा न केल्यास परवाना निलंबन, रद्द करणे तसेच फौजदारी कारवाईसह कठोर उपाययोजना करण्यात येतील, असा इशाराही विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Suicide News : खवड्या डोंगर दुर्घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी? आईच्या जुन्या व्हिडिओंमुळे नवे प्रश्न उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन