भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयातील पाच नव्या न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. या नियुक्त्यांनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या ३७ वर पोहोचली आहे. आता मंजूर असलेल्या ३८ पदांपैकी केवळ एकच पद रिक्त आहे.
नवीन नियुक्त झालेल्या न्यायाधीशांमध्ये ज्येष्ठ वकील वेंकिता सुब्रमणी मोहन, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू-काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांचा समावेश आहे.
मुंबई : मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात एकेकाळी दहशतीचे दुसरे नाव मानला जाणारा सय्यद मुज्जक्किर मुद्दस्सर हुसेन उर्फ मुन्ना झिंगाडा (Munna Jhingada) पुन्हा एकदा ...
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २७ मे रोजी या नावांची शिफारस केली होती. केंद्र सरकारने अवघ्या चार दिवसांत या शिफारसींना मंजुरी दिली. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या ३४ वरून ३८ पर्यंत वाढवली होती. यात भारताच्या सरन्यायाधीशांच्या पदाचाही समावेश आहे. न्यायाधीशांची संख्या वाढविल्यानंतर आणि आधीपासून रिक्त असलेल्या जागा धरून एकूण सहा पदे रिक्त होती. पाच नव्या नियुक्त्यांनंतर आता केवळ एकच जागा रिक्त राहिली आहे. मात्र, जून महिन्यात सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीश निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती पंकज मित्तल १६ जून रोजी तर न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी २८ जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
Nashik : नाशिक जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक, डीलर्स तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक संस्थांनी इंधन खरेदी-विक्री संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे. ...
ज्येष्ठ वकील वेंकिता सुब्रमणी मोहन यांची नियुक्ती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा (२०१८) यांच्यानंतर थेट वकिली व्यवसायातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होणाऱ्या त्या देशातील दुसऱ्या महिला वकील ठरल्या आहेत.५९ वर्षीय मोहन यांनी १९८८ मध्ये कोयंबतूर लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. २०१५ मध्ये त्यांना ज्येष्ठ वकील हा दर्जा मिळाला होता. त्यांच्या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची संख्या दोन झाली आहे. न्यायमूर्ती मोहन यांच्यासोबत न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना या दुसऱ्या महिला न्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती नागरत्ना २०२७ मध्ये एका महिन्याहून अधिक काळासाठी भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होणार आहेत.
सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. देशातील सराफा बाजारात २ जून २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठे बदल दिसून आले ...
सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. देशातील सराफा बाजारात २ जून २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठे बदल दिसून आले ...
सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. देशातील सराफा बाजारात २ जून २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठे बदल दिसून आले ...