Nashik News : पुणे विषारी दारू प्रकरणानंतर नाशिक पोलिसांना जाग, चार दिवसांत ३२ जणांना बेड्या

Nashik News : पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या विषारी दारुमुळे आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या विषारी दारूमुळे आतापर्यंत २४ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक बाधितांवर अजूनही विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आहेत. तर अनेक पोलिसांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. (Pune Poisonous Liquor Case)



५२ गुन्हे दाखल, ३२ संशयित ताब्यात


दरम्यान पुण्याच्या या खळबळ उडवून देणाऱ्या प्रकरणानंतर नाशिकचा राज्य उत्पादन शुल्क विभाग ( Excise Department) आणि पोलिस (police) अँ क्शन मोडवर असल्याचे पहायला मिळत आहे. नाशिकमध्ये (Nashik ) गेल्या चार दिवसांत अवैध दारू धंद्यांवर धडक कारवायांचा धडाका सुरू झाला आहे. २८ ते ३१ मे या अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) ५२ गुन्हे दाखल करत ३२ संशयितांची धरपकड केली आहे. संपूर्ण मे महिन्यात झालेल्या एकूण कारवायांपैकी तब्बल १५ टक्के कारवाया या केवळ गेल्या चार दिवसांतील आहेत.



झोपलेली प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी


यावरून पुणे प्रकरणानंतर (Pune Poisonous Liquor Case) नाशिकची झोपलेली प्रशासकीय यंत्रणा कशी खडबडून जागी झाली हे दिसून येते. पुण्याच्या घटनेनंतर नाशिकचे विभागीय आणि भरारी पथक तातडीने रस्त्यावर उतरली आहेत. घोटी, कळवण आणि इगतपुरी (Igatpuri) या तालुक्यांमध्ये (Taluka) अवैध दारूचे मोठे जाळे असल्याचे समोर आले असून, येथे सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. संशयितांची घरे, शेतातील शेड, नदीकाठचे भाग आणि हायवेवरील ढाबे, हॉटेल्स व खानावळींवर मध्यरात्री छापे टाकण्यात आले. मे महिन्यात विभागाने एकूण ३५८ गुन्हे दाखल करून ३८० जणांना अटक (Arrested) केली असून, दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी ६ वाहनेही जप्त केली आहेत.



गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त


केवळ उत्पादन शुल्कच नव्हे, तर नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीसही या मोहिमेत मागे नाहीत. निलंबनाच्या भीतीने पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. २९ आणि ३० मे या दोनच दिवसांत शहर पोलिसांनी १२, तर ग्रामीण पोलिसांनी १३ गुन्हे दाखल केले आहेत. अनेक ठिकाणी अवैध गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Monsoon News : अरबी समुद्रात चक्राकार वारे, राज्यात मान्सूनच्या प्रवासाला वेग; १ जुलैपासून मान्सून पूर्ण सक्रिय होणार

मुंबई : महाराष्ट्रात जून महिन्याच्या सुरुवातीला दाखल झालेला मान्सून गेल्या काही दिवसांपासून रखडल्यामुळे

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन

Indian Navy : भारताच्या नौदल ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांचा समावेश वाढती क्षमता, आत्मनिर्भरता, आधुनिकीकरणाचे प्रतीक

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत रविवारी एकाच वेळी तीन अत्याधुनिक स्वदेशी

NEET Exam : कडक सुरक्षा आणि कडक नियमांमध्ये ‘नीट’ परीक्षा उशिरा आलेल्यांना प्रवेश नाकारल्याने गोंधळ

नवी दिल्ली : ३ मे रोजी झालेली मूळ परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाल्यानंतर, रविवारी देशभरात कडक सुरक्षेमध्ये

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

Solicitor General Tushar Mehta: सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या तीन वर्षांसाठी फेरनियुक्तीसाठी मंजुरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून आणखी तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती