India A Squad Update : भारत अ संघात मोठा बदल! रियान पराग दुखापतीमुळे बाहेर; ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी एन्ट्री

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंकेत होणाऱ्या एकदिवसीय तिरंगी मालिकेपूर्वी India A (भारत अ) संघात मोठे बदल केले आहेत. संघाचा उपकर्णधार रियान पराग दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी महाराष्ट्राचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडची संघात निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ऋतुराजला थेट उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.


दुखापतीमुळे रियान पराग संघातून बाहेर


आयपीएल 2026 दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणारा रियान पराग हॅमस्ट्रिंग (पोटरी) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे श्रीलंकेत होणाऱ्या महत्त्वाच्या तिरंगी मालिकेत संघात त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे.



ऋतुराज गायकवाडची उपकर्णधार म्हणून निवड


रियानच्या अनुपस्थितीत निवड समितीने अनुभवी फलंदाज ऋतुराज गायकवाडवर विश्वास दाखवला आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ऋतुराजला केवळ संघात स्थानच मिळाले नाही, तर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. आता तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी भारत A संघाचे नेतृत्व करणार आहे.


वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष


या संघात 15 वर्षीय युवा सनसनाटी फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही समावेश करण्यात आले आहे. आयपीएल २०२६ मधील धडाकेबाज खेळीनंतर आता त्याला India A संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर प्रियांश आर्य, आयुष बडोनी, निशांत सिंधू आणि प्रभसिमरन सिंह यांसारखे युवा खेळाडूही संघात संधी देण्यात आली आहे.






तिरंगी मालिकेचे वेळापत्रक


9 जून – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ


11 जून – भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ


13 जून – अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ


15 जून – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ


17 जून – भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ


19 जून – अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ


21 जून – अंतिम सामना


भारत अ संघ (वनडे तिरंगी मालिका)


तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी, निशांत सिंधू, अनुकुल रॉय, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज आणि अर्शद खान.

Comments
Add Comment

IND vs SL Test : कोलंबोच्या मैदानात पुन्हा इतिहास रचण्याची जय्यत तयारी; १६ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने झळकावले होते ऐतिहासिक द्विशतक!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक कसोटी मालिकेचा दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील प्रसिद्ध सिंहलीज

BPL suffers : बीपीएलला ३१ कोटींचा फटका! यंदा स्पर्धा रद्द होण्याची शक्यता; भारत-बांगलादेश मालिकेच्या वेळापत्रकातही बदलाचे संकेत

बांगलादेश क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,

Hockey World Cup 2026 : हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखत भारताची पुढील फेरीत वाटचाल

हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये गुरुवारी भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये डी गटातील अखेरचा साखळी सामना रंगला. अत्यंत