सरकारी बंगला सोडण्यास राबडी देवींचा नकार

पाटणा : बिहार सरकारने माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना त्यांचा सरकारी बंगला '१० सर्कुलर रोड' खाली करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. मात्र राबडी देवी यांनी हा बंगला खाली करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. याच मुद्द्यावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.पाटणा विमानतळावर माध्यमांशी बोलताना राबडी देवी यांनी बिहार सरकारला थेट आव्हान दिले आहे. तसेच ‘कितीही फोर्स बोलवा, कोणत्याही परिस्थितीत आपला बंगला खाली करणार नाही’, असे सांगितले. राबडी देवी यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एक नवीन वाद सुरू झाला आहे.राबडी देवी आपला नातू इराजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पाटण्याला परतल्या होत्या. विमानतळावर पत्रकारांनी सरकारी बंगला खाली करण्याच्या आदेशाबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘सम्राट चौधरींनी कितीही फोर्स बोलावून बंगला खाली करण्याचा प्रयत्न केला तरी मी बंगला खाली करणार नाही’.




राबडीदेवींच्या सरकारी बंगला प्रकरणावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया


जे नियम आहेत, त्यांचे पालन करावं लागेल. सर्व कामं कायद्यानुसारच होतात आणि सर्वच लोकांनी नियमांचं पालन केलं पाहिजे. - बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार चौधरी


राबडी देवी बिहारच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत, त्यांनी असं विधान करायला नको होतं. यासाठी बिहार पोलिसांचीही गरज नाही, एक अधिकारी जाऊन बंगला खाली करून घेईल. - भाजप राज्यसभा खासदार भीम सिंह


हे काही जंगलराज नाही, इथे कायद्याचे पालन करावेच लागेल. उपचारासाठी सिंगापूरला जातात, नातवाचा वाढदिवस साजरा करायला दिल्लीला जातात आणि जेव्हा लुटण्याची वेळ येते तेव्हा बिहारमध्ये पळून येतात. हे सर्व आता चालणार नाही, कायद्याचा आदर करावाच लागेल. लालू कुटुंबियांनी अखेर ‘१० सर्कुलर रोड’च्या बंगल्यात असा कोणता खजिना लपवून ठेवला आहे? जर तिथे खजिना लपवलाही असेल, तर बिहार पोलीस तो शोधून काढतील. - नीरज कुमार, भाजप प्रदेश प्रवक्ते

Comments
Add Comment

Mumbai : पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी २ हजार ५०० रिचार्ज खड्डे

भूजल पातळी वाढवण्याचा महापालिकेचा उपक्रम मुंबई : वाढते शहरीकरण, सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे आणि भूजल

विनेश फोगट 'आशियाई' शर्यतीतून बाहेर!

नवी दिल्ली : भारताची ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगट हिचे २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व

जपानकडून भारतीय आंब्यावर बंदी, तर चीनने तांदळाचे ७० साठे परतवले

दुहेरी फटका ! निर्यात प्रक्रिया अधिक कडक करण्याची गरज नवी दिल्ली :भारतीय आंबा निर्यातदारांना यंदाच्या हंगामात

आयएसआय-दाऊद नेटवर्कशी संबंधित दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई करत पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, दाऊद इब्राहिम

Bhivandi : भिवंडीत 'मिथेनॉल'चा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई

मुंबई, दि. ३० : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन