Kalyan Crime : प्रेमविवाहाचा राग मनातच ठेवला; साखरपुडा मोडून लग्न केलेल्या मुलीची वडिलांनी केली हत्या

Crime News : कल्याण शहरात नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका वडिलांनी स्वतःच्या विवाहित मुलीची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील पार नाका परिसरात राहणाऱ्या गायत्री वसईकर हिने काही महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह केला होता. याआधी तिचा साखरपुडा ठरला होता. मात्र, तिने तो मोडून स्वतःच्या पसंतीच्या युवकासोबत लग्न केले होते. या निर्णयामुळे तिचे वडील विनोद वसईकर प्रचंड नाराज होते. घटनेच्या दिवशी गायत्री माहेरी आली होती. दुपारच्या जेवणानंतर घरात पुन्हा एकदा प्रेमविवाहाच्या मुद्द्यावरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मुलीने कुटुंबाचे ऐकले नाही याचा राग आरोपीच्या मनात कायम होता. वाद वाढत गेला आणि संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी धारदार शस्त्राने गायत्रीवर हल्ला केला.


हल्ल्यात गायत्री गंभीर जखमी झाली होती. तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते. जास्त रक्त वाहण्यामुळे तिचा जागीच थोड्या वेळाने मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी वडील फरार झाले होते. मात्र, बाजारपेठ पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत त्यांना अटक केली. या घटनेमुळे कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमविवाहावरून स्वतःच्या मुलीचा जीव घेण्याइतका संताप कसा निर्माण झाला, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कुटुंबातील मतभेद, सामाजिक दबाव आणि वैयक्तिक निर्णयांमुळे निर्माण होणारे तणाव किती टोकाला जाऊ शकतात, याचे हे अत्यंत धक्कादायक उदाहरण मानले जात आहे. सध्या बाजारपेठ पोलीस या प्रकरणाचा सखोल तपासणी करत आहेत.

Comments
Add Comment

२०१९ मधील लाभधारक शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमाफी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; 'भाडे के टट्टू'वर आक्षेप घेणाऱ्यांना संबोधले 'सुपारीबाज'

मुंबई : राज्यातील बळीराजाला आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देणाऱ्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी

Narendra Modi भारताशी असलेले नाते अटळ आहे', न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

ऑकलंड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात करत असताना,

NPPA : महागडी औषधे आता खिशाला परवडणार, ३९ औषधांच्या किमती एनपीपीएद्वारे नियंत्रित

नवी दिल्ली : सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘नॅशनल

Pakistani Gangster : एटीएसने विदर्भातून दहा जणांना घेतले ताब्यात, पाकिस्तानी गँगस्टरशी सोशल मिडीयावर संपर्काचा संशय

नागपूर : महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज, शुक्रवारी राज्यभर केलेल्या कारवाईंतर्गत

Astronaut Anil Menon : भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन अंतराळ मोहिमेसाठी १४ जुलैला होणार रवाना

कझाकस्तान : भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन हे १४ जुलै रोजी कझाकस्तानमधील बैकोनूर कॉस्मोड्रोम येथून

मध्य रेल्वेतर्फे 'उर्स' उत्सवासाठी ४ अनारक्षित विशेष गाड्या

मुंबई : 'उर्स' उत्सवासाठी प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज