Crime News : ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणी सासू आणि पतीला CBI कोठडी

भोपाळ : जिल्हा सत्र न्यायालयाने ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणी सासू गिरीबाला सिंह आणि पती समर्थ सिंह या दोघांना प्रत्येकी पाच दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे. याआधी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने गिरीबालाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, नंतर थोड्या वेळातच ट्विशाच्या सासूला अटक करण्यात आली.



समर्थ सिंगला सर्वप्रथम २३ मे रोजी भोपाळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्याला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.मध्य प्रदेश सरकारच्या शिफारशीनुसार तपास हाती घेतल्यानंतर, सीबीआयने पुढील चौकशीसाठी समर्थची नवीन कोठडी मागितली.रिमांडच्या काळात, एजन्सीने समर्थला गुन्ह्याच्या ठिकाणी नेले आणि अत्याधुनिक तपास साधनांनी सुसज्ज असलेल्या दिल्लीतील विशेष पथकाच्या मदतीने सखोल न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणी केली.



गिरीबाला सिंहवर हुंडाबळीसाठी कलम ८०(२), पती किंवा नातेवाईकांकडून महिलेवर होणाऱ्या क्रूरतेसाठी कलम ८५, आणि समान उद्देशाने अनेक व्यक्तींनी केलेल्या कृत्यांसाठी कलम ३(५) अंतर्गत आरोप आहेत. याव्यतिरिक्त, तिच्यावर हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (CBI) या प्रकरणाचा तपास हाती घेऊन जलदगतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, मृत पीडित ट्विशा शर्मा यांचे कुटुंब आणि आरोपी - ट्विशाचा पती समर्थ सिंग व तिची सासू, ज्या एक माजी न्यायाधीश आहेत - या दोघांनाही या मृत्यू प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासावर सार्वजनिक वक्तव्ये करण्यापासून परावृत्त राहण्याचे आवाहन केले.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन