Betwa River Bridge Collapses : उत्तर प्रदेशात बेतवा नदीवरील बांधकामाधीन पुलाचा स्लॅब कोसळून सहा मजुरांचा मृत्यू;अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

- बचाव कार्यासाठी एसडीआरएफ पथक तैनात; जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी


लखनऊ : उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात बेतवा नदीवर बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाचा स्लॅब आणि शटरिंग शुक्रवारी पहाटे जोरदार वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून सहा मजुरांचा मृत्यू झाला असून, आणखी काही जण मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. (Betwa River Bridge Collapses)


मिळालेल्या माहितीनुसार, जिल्यातील ललपुरा परिसरातील परसनी आणि कंडौर गावांदरम्यान बेतवा नदीवर गेल्या तीन वर्षांपासून नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास सर्व मजूर पुलाखाली झोपलेले असताना जोरदार वादळ आणि पावसादरम्यान पुलाची स्लॅब व शटरिंग अचानक कोसळली. दुर्घटनेनंतर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले. (Betwa River Bridge Collapses)



घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि सेतू निगमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बचाव कार्यासाठी एसडीआरएफला तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत मलब्यातून चिल्ला बांदा येथील लोकेन्द्र (२४) पुत्र राधेश्याम निषाद, कुलदीप (२१) पुत्र प्रेमचंद्र निषाद, भूरागढ बांदा येथील सावंत (३०), स्वासा ललपुरा हमीरपूर येथील सभाजीत (३०), पुष्पेन्द्र सिंह (३५) आणि अछपुरा ललपुरा येथील राजेश पाल (४१) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. (Betwa River Bridge Collapses)


मजुरांनी राजेश, कल्लू आणि अवधेश यांच्यासह इतर काही मजूरही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली आहे. बचाव पथकाने पुलाच्या खांबात अडकलेल्या तीन मजुरांना सुरक्षित बाहेर काढले आहे. (Betwa River Bridge Collapses)


ललपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश सरोज यांनी सांगितले की, दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सापडलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. (Betwa River Bridge Collapses)



दरम्यान, हमीरपूर सदर विधानसभा क्षेत्रात राठ-हमीरपूर राज्य महामार्गाला परसनी, कंडौरमार्गे कुरारा फोरलेन महामार्गाशी जोडण्यासाठी ललपुरा पोलीस ठाणे क्षेत्रातील परसनी आणि कंडौर गावांदरम्यान बेतवा नदीवर हा नवा पूल बांधला जात आहे. या पुलासाठी ७९१२,२४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या पुलासाठी स्थानिक राज्यसभा खासदार बाबूराम निषाद यांनी मोठा पुढाकार घेतला होता. हा पूल पूर्ण झाल्यानंतर कुरारा ते मिर्झापूर-झाशी महामार्गाशी परसनीकडे जाणारे अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. (Betwa River Bridge Collapses)



२६ गावांतील दीड लाख ग्रामस्थांना मोठा दिलासा :


राज्यसभा खासदार बाबूराम निषाद यांनी सांगितले की, बेतवा नदीवर नवा पूल उभारल्यामुळे परसनी गावासह मौराकांदर, बहरौली डांडा, कलौलीजार, उजनेडी, अछपुरा वहदीना, स्वासा बुजुर्ग, स्वासा खुर्द, कुम्हऊपुर, कुआं डेरा, कंडौर, बैजेमऊ इस्लामपुर, हरेहटा, पतारा, जखेला, नैठी, रिठारी, छानी खुर्द, छानी बुजुर्ग, देवीगंज आदी २६ गावे वेगाने विकसित होतील. त्यांनी सांगितले की, हे ग्रामीण भाग अद्याप विकासाच्या बाबतीत खूप मागासलेले आहेत. शासनाने पुलाच्या बांधकामाला हिरवा कंदील दिला होता.

Comments
Add Comment

Petrol-Diesel Stock : देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी, नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा पुरेसा साठा - केंद्र सरकार

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, देशात

Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’ला दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका; सोशल मीडिया खाते पूर्ववत करण्याबाबत दिला मोठा निर्णय

नवी दिल्ली : अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील ‘कॉकरोच जनता पार्टी’ला (Cockroach Janata Party - CJP) दिल्ली उच्च न्यायालयाकडून

IPL Final 2026 : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! IPL फायनलसाठी मुंबई ते अहमदाबाद धावणार 'स्पेशल ट्रेन'

मुंबई : अहमदाबाद (Ahemdabad) येथे होणाऱ्या आयपीएल (IPL) २०२६ च्या महामुकाबल्याचा थरार प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन अनुभवू

Nisos Keros Indian Ship : आनंदवार्ता! होर्मुज सामुद्रधुनी पार करत ‘निसोस केरोस’ जहाज भारताकडे रवाना

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीदरम्यान भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Crime News : ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणी सासू आणि पतीला CBI कोठडी

भोपाळ : जिल्हा सत्र न्यायालयाने ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणी सासू गिरीबाला सिंह आणि पती समर्थ सिंह या दोघांना

Supreme Court : ‘तारीख पे तारीख’ला लागणार पूर्णविराम! हायकोर्टांना सुप्रीम कोर्टाची कडक डेडलाइन; राखीव निकाल ३ महिन्यांत देणे बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटले आणि निकाल देण्यास होणारा विलंब यावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court)