Yeola : १५० क्विंटल कांदा उकिरड्यावर , उष्णतेमुळे साठवणुकीतील कांदा धोक्यात

येवला : हवामानातील बदल आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. येवला (Yeola) तालुक्यातील पारेगाव (Paregaon) येथे कांदा चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडल्याची घटना समोर आली आहे. बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे चार पैसे जास्तीचे मिळतील या आशेने कांदा साठवला होता, मात्र आता तोच कांदा कुजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.



अतिउष्णतेने कांदा शिजला; लागली बुरशी


पारेगाव येथील शरद रामभाऊ खिल्लारे या शेतकऱ्याचा अंदाजे १२५ ते १५० क्विंटल (एकूण पाच ट्रॉली) कांदा अतिउष्णतेमुळे पूर्णपणे सडला आहे. मे महिन्यातील तीव्र उष्णतेचा फटका चाळीतील साठवणुकीला बसला. कमालीच्या तापमानामुळे कांदा चाळीतच शिजून गेल्यासारखा झाला असून, त्यावर मोठ्या प्रमाणात बुरशी तयार झाली आहे. हा सडलेला कांदा आता बाजारात विक्रीयोग्य राहिला नसल्यामुळे, अत्यंत जड अंतःकरणाने शेतकऱ्यांवर हा कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. (Loss of 150 quintals of onion)



कांद्याचे कोलमडलेले अर्थकारण


शेतकरी उन्हाळी म्हणजेच रब्बी कांदा मोठ्या आशेने चाळीमध्ये साठवून ठेवतात. पावसाळ्यात जसे भाव सापडतील, त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने हा कांदा बाजारात विकला जातो. यातून मिळणाऱ्या भांडवलावरच शेतकऱ्यांचे पुढील पिकांचे आणि कुटुंबाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. मात्र, यावर्षी साठवणूक केल्यानंतर अवघ्या महिना-दीड महिन्यातच बदललेल्या हवामानाचा आणि वाढत्या पाऱ्याचा तीव्र फटका साठवणुकीतील कांद्याला बसला आहे. त्यामुळे पुढील पिकांच्या भांडवलाचा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. (Loss of 150 quintals of onion)



शासकीय अनुदानाची वाढती मागणी


कांद्याला योग्य भाव मिळावा आणि निर्यातबंदी उठवावी या प्रमुख मागण्यांसाठी नुकतेच नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. कांद्याचा प्रश्न आधीच पेटलेला असताना, आता चाळीत साठवलेल्या कांद्याच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी पुरता खचला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून शासनाने तातडीने पारेगाव व परिसरातील चाळींचे पंचनामे करावेत आणि साठवलेल्या कांद्याच्या नुकसानीसाठी थेट आर्थिक अनुदान द्यावे, अशी तीव्र मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Comments
Add Comment

Sanjay Dina Patil : एका व्यक्तीच्या त्रासामुळे मी पक्ष सोडला ; खासदार संजय दिना पाटील यांचा आरोप

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाले. उबाठाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Gokul Gite : शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून शपथ घेणार

मुंबई : "मी शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून उद्या विधानपरिषदेत शपथ घेणार आहे. भविष्यात एकनाथ शिंदे यांनी संधी दिली

Women's Cricket : महिला क्रिकेटपटूंसाठी ICC ने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : खेळपट्ट्यांवर चौकार-षटकार मारणारी एखादी खेळाडू जेव्हा आई होण्याचा निर्णय घेते, तेव्हा बऱ्याचदा

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू