चार राज्यांत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

पंजाबवरही विशेष लक्ष

नवी दिल्ली  :
भारतीय जनता पक्षाने दिल्लीसह चार राज्यांमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करत संघटनात्मक फेरबदल केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.दिल्ली भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी वीरेंद्र सचदेवा यांची जागा घेतली आहे. हरियाणामध्ये अर्चना गुप्ता यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तब्बल ४३ वर्षांनंतर हरियाणात एखाद्या महिलेची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. अर्चना गुप्ता या व्यवसायाने डॉक्टर आहेत.



पंजाबमध्ये सरदार केवल सिंह ढिल्लों यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ढिल्लों हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये भाजप संघटना मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. त्रिपुरामध्ये अभिषेक देबरॉय यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. या बदलांमधून भाजप आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. पंजाबमध्ये शीख नेतृत्वाला संधी देत भाजपने राज्यातील राजकीय समीकरणांवर लक्ष केंद्रीत केल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे

Comments
Add Comment

BEST Strike : 'बेस्ट' संपावर तातडीने तोडगा काढून 'नीट' परीक्षार्थींना दिलासा द्या

माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी मुंबई,  : गुरुवारच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या

Nitesh Rane : आदित्य ठाकरे 'उबाठा'चा अभिषेक बॅनर्जी!

 मंत्री नितेश राणेंचा टोला; 'महाराष्ट्रात फिरण्यासाठी त्यांना हेल्मेट पाठवणार' मुंबई : "उबाठा गट काँग्रेसमध्ये

Navnath Ban : संजय राऊतांनी औरंगजेबाचा इतिहास सांगायला हवा

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात MUMBAI : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी

Gold Silver Rate Today : संधी चुकवू नका ! सोने 6000 तर चांदी 23 हजारांनी घसरली; सोने चांदीचे आजचे दर काय ?

Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ उतार पहायला मिळत आहे. अशातच सोने खरेदी करून

Nashik : नाशिक जिल्ह्यात १८२ टँकरद्वारे ३.२३ लाख नागरिकांना पाणीपुरवठा

नाशिक : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातील नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी

Nashik : पाणीसंकट गडद ! 67 गावांना दिलासा देणारी योजना अडचणीत; येवल्यात चार दिवसांआड पाणीपुरवठा

Nashik : येवला तालुक्यातील ५४ गावे आणि १३ संस्था अशा एकूण ६७ गावांची तहान भागवणारी व आशिया खंडात नावाजलेली '३८ गाव