मराठवाड्यातील शेतकरी सध्या निसर्गाचा बेभरवसा, डिझेल-पेट्रोलची तीव्र टंचाई, वाढलेले इंधन दर आणि रखडलेली कर्जमाफी अशा अनेकविध संकटांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच मशागतीसाठी लागणारे डिझेल मिळेनासे झाले आहे, तर दुसरीकडे नवीन पीक कर्ज न मिळाल्याने खते आणि बी-बियाणे खरेदी कशी करावी, या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे. प्रशासकीय उदासीनता आणि आचारसंहितेची आडकाठी यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, मराठवाड्यात विशेषतः बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचा आकडा चिंताजनकरीत्या वाढत आहे.
इंधनाचे वाढलेले दर तसेच डिझेल टंचाईमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. यांत्रिकी शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना इंधन टंचाईचा फटका बसत आहे. दुसरीकडे राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी मे महिना संपत आलेला आहे. अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे नवीन पीक कर्ज मिळत नाही. खरीप हंगाम तोंडावर असल्याने खते, बी-बियाणे खरेदी कशी करावी या
Trimbakeshwar : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी तसेच कुशावर्त स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी ...








