Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार करून १५ जून २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या ...
एका चित्रपटाचे काम सुरू झाले होते. रणवीरसोबतच्या कामाचे नियोजन करण्यात आले होते. सुमारे ४५ कोटी रुपयांचा खर्च झाला होता, असे दिग्दर्शक फरहानने सांगितले. या टप्प्यावर अचानक रणवीरने माघार घेतली आहे. या पद्धतीने कोणताही कलाकार आयत्यावेळी निर्णय बदलणार असेल तर निर्मात्याचे प्रचंड नुकसान होईल. एखाद्यावर आत्महत्येचीच वेळ येईल. त्यामुळे ही पद्धत थांबली पाहिजे. व्यावसायिकता जपली पाहिजे.
माघार घेणाऱ्याने चर्चा करून निर्मात्याचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती भरपाई देऊन तोडगा काढणे आवश्यक आहे. फरहान अख्तर आणि रणवीरने परस्पर चर्चा केली आणि मार्ग काढला तर FWICE त्याचे स्वागत करेल. पण कोणाचेही नुकसान कलाकाराने मधूनच चित्रपट सोडू नये. प्री प्रॉडक्शनवर ४५ कोटींचा खर्च झाला असताना अचानक चित्रपट सोडणे योग्य नाही, असे अशोक पंडित म्हणाले.