Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार करून १५ जून २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोकण रेल्वेवर विशेष मान्सून वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मुंबई-गोवा मार्गावरील अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा पत्रकात बदल होणार आहे.या बदलाचा फटका कोकणकन्या एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेस यांसारख्या लोकप्रिय गाड्यांना बसणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वेळापत्रक तपासणे अत्यावश्यक ठरणार आहे.


मुसळधार पाऊस, रुळांवर पाणी साचणे, झाडे पडणे आणि दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे रेल्वे प्रशासन दरवर्षी मान्सूनवेळी रेल्वेच्या वेळपत्रकात बदल करते. यावेळीही वेळपत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे काही गाड्या उशिराने धावतीलकोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, 15 जून ते 20 ऑक्टोबरदरम्यान मूळ स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांनाच हे वेळापत्रक लागू असेल. विविध गाड्यांच्या सुधारित वेळांची माहिती स्वतंत्र परिशिष्टाद्वारे जाहीर केली जाणार आहे. ती स्थानकांवरील सूचना फलक, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली आणि अधिकृत माध्यमांतून उपलब्ध करून दिली जाईल.दरम्यान, मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांची कामे सुरू आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या सध्या 3 ते 4 तास उशिराने धावत आहेत. तसेच मुंबईतील सीएसएमटी आणि एलटीटी स्थानकांवरील काही गाड्यांचे लास्ट स्टेशनही बदलण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अपडेट्स तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे