मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात इंधन तुटवडा जाणवत आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे.
इंधनटंचाई असल्याची अफवा काही भागांत पसरली आहे, या अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत आहे , आणि त्यामुळे पेट्रोल-डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल-डिझेल वितरणाच्या आढावा बैठकीत मंत्री छगन भुजबळ बोलत होते. बैठकीस अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, राज्य शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे तसेच विविध तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गुलमर्ग : गुलमर्ग गोंडोला या नावाने प्रसिद्ध असलेली गुलमर्गची केबल कार सेवा तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आणि सुमारे ३०० पर्यटक संकटात सापडले. लष्कर, ...
राज्यातील जिल्हानिहाय विक्रीच्या आकडेवारीनुसार दैनंदिन विक्रीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. याचे कारण इंधनटंचाईची अफवा असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले आहे. राज्यात पेट्रोल विक्रीत सुमारे २३ टक्के तर डिझेल विक्रीत तब्बल ५२ टक्के वाढ झाली आहे. अकोला येथे पेट्रोल विक्रीत ४४ टक्के, बुलढाणा येथे ४७ टक्के, जालना येथे ४९ टक्के तर वर्धा येथे ४३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. डिझेल विक्रीतही अनेक जिल्ह्यांत ६० ते १०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी मंत्री भुजबळ यांनी तेल कंपन्यांना जिल्हा व तालुका स्तरावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. राज्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती नागरिकांपर्यंत सातत्याने पोहोचवावी, असे देखील त्यांनी सांगितले.
काही ठिकाणी किरकोळ घटनांच्या आधारे इंधनटंचाईच्या अफवा पसरवल्या जात असून त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आणि तेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खरेदीवर लक्ष ठेवून अतिरिक्त साठेबाजी रोखावी, असे निर्देशही मंत्री भुजबळ यांनी दिले.