CM Devendra Fadnavis : पुण्यात ४०० कोटींची नवी गुंतवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘अग्रेको इंडिया’सोबत सामंजस्य करार

मुंबई : राज्याची 'आयटी' राजधानी असलेल्या पुण्यात ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना क्षेत्रात कार्यरत असलेल्या 'अग्रेको इंडिया' कंपनीकडून ४०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून पुण्यात अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी व उत्पादन केंद्र उभारण्यात येणार असून, याद्वारे पुढील दहा वर्षांत सुमारे एक हजार थेट रोजगार निर्माण होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी राज्य शासन आणि अग्रेको इंडिया यांच्यात या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.


सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या करारप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगण, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, अग्रेको इंडियाचे संचालक सन्नी ठकरार, ग्रुप प्रमुख स्टीफन रेआ, व्यवस्थापकीय संचालक राहुल खरे, हेड ऑफ प्रोक्युअरमेंट अँड ग्लोबल सप्लाय सुनील देशमुख, व्यापार सल्लागार मार्क बिरेल आणि वरिष्ठ व्यापार सल्लागार प्रतीक्षा क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.


"पुणे हे आता 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स'चे (जीसीसी) अत्यंत महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयाला येत आहे. या 'जीसीसी कॅपिटल'मध्ये अग्रेको कंपनीचे स्वागत आहे. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात या कंपनीला अत्यंत उत्कृष्ट आणि पोषक कार्यपरिसर मिळेल," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच, पुणे येथील प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या, नोंदणी आणि अन्य प्रशासकीय बाबींमध्ये शासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागांच्या माध्यमातून या गुंतवणुकीला गती दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.




स्कॉटलंडबाहेरील सर्वात महत्त्वाचे केंद्र


अग्रेको इंडिया ही कंपनी प्रामुख्याने ऊर्जा आणि तापमान नियंत्रण क्षेत्रात कार्यरत आहे. आज झालेल्या करारानुसार, पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे कंपनीतर्फे अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राचे काम याच वर्षाच्या मध्यावर सुरू होणार असून, विशेष म्हणजे स्कॉटलंडबाहेर उभारले जाणारे हे अग्रेकोचे सर्वात महत्त्वाचे जागतिक केंद्र ठरणार आहे.



एमएसएमई उद्योगांना मोठा फायदा


या प्रकल्पामुळे केवळ थेट रोजगारच निर्माण होणार नाही, तर स्थानिक पुरवठा साखळीलाही मोठी चालना मिळणार आहे. पुण्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची सुवर्णसंधी यामुळे उपलब्ध होईल. याशिवाय अत्याधुनिक उत्पादन, ऊर्जा उपकरण निर्मिती आणि 'प्रिसिजन इंजिनिअरिंग' क्षेत्रात महाराष्ट्राची क्षमता अधिक भक्कम होण्यास मदत होणार आहे.




शाश्वत तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांवर भर


अग्रेको कंपनीचा या प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यक्षम ऊर्जा आणि शाश्वत तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना विकसित करण्यावर भर असणार आहे. विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हवामान बदलांविरोधातील प्रतिकारक्षमता मजबूत करण्यासाठी कंपनीकडून विशेष प्रयत्न केले जातील. राज्याच्या हवामान बदल कृती आराखड्याला पूरक ठरणाऱ्या शाश्वत ऊर्जा प्रणालींच्या प्रसारासाठीही शासनाला सहकार्य करण्याची ग्वाही कंपनीने दिली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ