Buldhana : हृदयद्रावक ! 4 मुलांना विहिरीत ढकलून वडिलांनीही जीवनयात्रा संपवली, नेमकं काय घडलं ?

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राजुरा येथील धरण परिसरात एका विहिरीत वडील आणि चार मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विजय मुसा किराडिया असे या वडिलांचे नाव असून एवढा मोठा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या पत्नीला माहेरी सोडलं आणि त्यानंतर ४ मुलांसह स्वतःची जीवनयात्रा संपवली.


मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील विजय किराडिया यांच्या पत्नी काल घरगुती वादानंतर माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी पत्नीला माहेरी सोडले. त्यानंतर गावाकडे परतताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी घरात काम करत असताना त्यांच्या वडिलांनी पत्नीबद्दल विचारणा केली होती. त्यातून पुन्हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.



यानंतर विजय किराडिया आपल्या चारही मुलांना घेऊन राजुरा धरण परिसरात गेले. तेथे त्यांनी मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. विजय मुसा किराडिया याने आपली मुले प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया व पियुष किराडिया यांसह राजुरा धरण परिसरातील विहिरीत जीवन संपवलं.


घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पाचही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. घरगुती कलह आणि मानसिक तणावातून ही घटना घडल्याची शक्यता तपासली जात आहे. याप्रकरणी, पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत. घरगुती वादातून किंवा आर्थिक विवंचनेतूनच हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Comments
Add Comment

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात