Modi : 'पंतप्रधान मोदींचे काम पुस्तकात मांडणे कठीण'

मोदींनी १२ वर्षांत भारताला आत्मनिर्भर बनवले


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत विविध क्षेत्रांत झालेले अभूतपूर्व परिवर्तन आणि देशाची झालेली प्रगती इतकी अथांग आहे की, हे सर्व कार्य केवळ एका पुस्तकात किंवा भाषणात मांडणे अशक्य आहे. मोदींनी भारताला स्वाभिमानी आणि 'आत्मनिर्भर भारत' म्हणून जागतिक पातळीवर उभे केले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत ‘राष्ट्रनिर्माणाची तप:पूर्ती’ या विशेष संग्राह्य ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या विकासाचा आलेख मांडत आधीच्या यूपीए सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे मंत्री, वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "मोदी सरकारने गेल्या १२ वर्षांत सर्वात महत्त्वाची वाटचाल सामाजिक क्षेत्रात केली आहे. गरिबांना घरगुती गॅस, हक्काची घरे आणि शौचालये उपलब्ध करून देत मोदीजींनी नेहमीच गरीब केंद्रित अजेंडा राबवला. याच धोरणामुळे अवघ्या १० वर्षांत भारताने तब्बल २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढले आहे. जगातील कोणत्याही देशाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले आणि हे आज संपूर्ण जगानेही मान्य केले आहे."



भारताने आर्थिक क्षेत्रात केलेली प्रगती थक्क करणारी असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी मांडली. "२०१३ मध्ये भारताचा जीडीपी १०३ लाख कोटी रुपये होता. आज तो तब्बल ३५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या दहा-बारा वर्षांत देशाचा जीडीपी तीन पटीने वाढला आहे. मोदीजींनी रचलेल्या या भक्कम पायामुळेच भारताची अर्थव्यवस्था आता वेगाने पुढे जात आहे," असे फडणवीस म्हणाले.

यूपीएच्या काळात 'अनुदानप्रणित' अर्थव्यवस्था


"आधीच्या यूपीए सरकारच्या काळात केवळ अनुदानावर लोकांनी जगले पाहिजे, असे धोरण होते. आम्ही नव्या संधी निर्माण करणार नाही आणि पायाभूत सुविधांवर खर्च करणार नाही, अशीच त्या वेळच्या राज्यकर्त्यांची मानसिकता होती. या अनुदानप्रणित अर्थव्यवस्थेमुळे देशाच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला आणि विकास खुंटला. याउलट मोदी सरकारने पायाभूत सुविधांचा विकास करत देशात रोजगाराच्या आणि प्रगतीच्या नव्या संधी निर्माण केल्या," अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य