Modi : 'पंतप्रधान मोदींचे काम पुस्तकात मांडणे कठीण'

मोदींनी १२ वर्षांत भारताला आत्मनिर्भर बनवले


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत विविध क्षेत्रांत झालेले अभूतपूर्व परिवर्तन आणि देशाची झालेली प्रगती इतकी अथांग आहे की, हे सर्व कार्य केवळ एका पुस्तकात किंवा भाषणात मांडणे अशक्य आहे. मोदींनी भारताला स्वाभिमानी आणि 'आत्मनिर्भर भारत' म्हणून जागतिक पातळीवर उभे केले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत ‘राष्ट्रनिर्माणाची तप:पूर्ती’ या विशेष संग्राह्य ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या विकासाचा आलेख मांडत आधीच्या यूपीए सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे मंत्री, वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "मोदी सरकारने गेल्या १२ वर्षांत सर्वात महत्त्वाची वाटचाल सामाजिक क्षेत्रात केली आहे. गरिबांना घरगुती गॅस, हक्काची घरे आणि शौचालये उपलब्ध करून देत मोदीजींनी नेहमीच गरीब केंद्रित अजेंडा राबवला. याच धोरणामुळे अवघ्या १० वर्षांत भारताने तब्बल २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढले आहे. जगातील कोणत्याही देशाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले आणि हे आज संपूर्ण जगानेही मान्य केले आहे."



भारताने आर्थिक क्षेत्रात केलेली प्रगती थक्क करणारी असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी मांडली. "२०१३ मध्ये भारताचा जीडीपी १०३ लाख कोटी रुपये होता. आज तो तब्बल ३५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या दहा-बारा वर्षांत देशाचा जीडीपी तीन पटीने वाढला आहे. मोदीजींनी रचलेल्या या भक्कम पायामुळेच भारताची अर्थव्यवस्था आता वेगाने पुढे जात आहे," असे फडणवीस म्हणाले.

यूपीएच्या काळात 'अनुदानप्रणित' अर्थव्यवस्था


"आधीच्या यूपीए सरकारच्या काळात केवळ अनुदानावर लोकांनी जगले पाहिजे, असे धोरण होते. आम्ही नव्या संधी निर्माण करणार नाही आणि पायाभूत सुविधांवर खर्च करणार नाही, अशीच त्या वेळच्या राज्यकर्त्यांची मानसिकता होती. या अनुदानप्रणित अर्थव्यवस्थेमुळे देशाच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला आणि विकास खुंटला. याउलट मोदी सरकारने पायाभूत सुविधांचा विकास करत देशात रोजगाराच्या आणि प्रगतीच्या नव्या संधी निर्माण केल्या," अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर