Sindhudurg : सिंधुदुर्गातील वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करून वाहतुकीचे नियोजन करा, पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशांतर्गत पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा हा पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करा, तसेच स्वच्छता आणि पार्किंग व्यवस्थेवर विशेष भर देऊन पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane ) यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन सोयी-सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. बैठकीत बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले असून, येथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. ही वाढती संख्या लक्षात घेता, स्थानिक पातळीवर पर्यटकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. विशेषतः सुट्ट्यांच्या कालावधीत होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने योग्य आराखडा तयार करावा. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी स्वच्छतेवर विशेष भर दिला जावा."


या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर पोलीस अधीक्षक नेओमी साटम, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



गोवंश हत्या आणि अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करा


महाराष्ट्र शासनाने गोवंशाची अवैध वाहतूक (Illegal transportation of cattle) , गोहत्या तसेच बेकायदेशीर कत्तलखान्यांवर (illegal slaughterhouses) कठोर कारवाई करण्यासाठी अत्यंत कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कायद्याची १०० टक्के आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली.


जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर कृत्य खपवून घेतले जाणार नाही, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राखली पाहिजे, असे आदेश नितेश राणे यांनी पोलिसांना आणि महसूल प्रशासनाला दिले. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Comments
Add Comment

Former BJP MLA Patlya Guruji : भाजपाचे माजी आमदार पटल्या गुरुजी काळाच्या पडद्याआड; मेळघाटच्या ज्येष्ठ नेत्याला अखेरचा निरोप, सर्वत्र हळहळ

अमरावती : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ नेते पटल्या

A 'death trap' in Tandulwadi : १० वर्षांपूर्वीचा भीषण इतिहास पुन्हा; ८ जणांचा जीव घेणाऱ्या विहिरीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा?

माळशिरस (सोलापूर): म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप

Minister Dada Bhuse : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध! शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

नंदुरबार : “शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.

Solapur Accident :म्हसवड-पंढरपूर महामार्गावरील अपघातात राज्य सरकारची मोठी कारवाई

सोलापूर : म्हसवड -पंढरपूर महामार्गावरील तांदळवाडीजवळ एक वेगाने प्रवास करत असलेले वाहन विहिरीत पडले. या

Jalgaon Crime : जीवघेण्या हल्ल्यातील जखमी तरुण रुग्णालयात तर मुख्य आरोपी मोकाट

Jalgaon Crime : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून सर्वच

Pune News: पुणे विमानतळावर १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबलात तर ५०० रुपयांचा दंड; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

पुणे : पुणे विमानतळ (Pune Airport) परिसरातील वाढती वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय