मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, पाच ठार

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात रविवारी पहाटे ही भीषण तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १२ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेतीने भरलेल्या डंपरने एका वाहनाला धडक दिली, याचवेळी मागून आलेली ट्रॅव्हल्स वाहन जोरदार धडकल्याने हा तिहेरी अपघात घडला. या अपघातानंतर घाट परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लळिंग घाटातून भरधाव वेगाने जाणाऱ्या रेतीच्या डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे डंपर विरुद्ध बाजूला गेला आणि समोरून जाणाऱ्या एका वाहनावर धडकला. याचवेळी मालेगावकडून आलेले ट्रॅव्हल्स वाहन अपघातग्रस्त वाहनांवर जोरदार धडकले. ही धडक इतकी भीषण होती की वाहनांचा अक्षरशः चुराडा झालाय.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महामार्ग पोलीस, तसेच टोल नाक्यावरील मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे बचावकार्य राबविण्यात आले. गंभीर जखमींना उपचारासाठी धुळे येथील शासकीय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांची आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



दरम्यान, अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी लळिंग टोल नाक्यावर आंदोलन सुरू करत टोल वसुली बंद पाडली. “आम्हाला कोणतीही सुरक्षा नाही, विमा संरक्षण नाही, तरीही आम्ही जीव धोक्यात घालून अपघातग्रस्तांना मदत करतो.आमच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक सुविधा व सुरक्षा पुरवायला हवी होती,” असा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


अपघातानंतर लळिंग घाट परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Comments
Add Comment

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Sanchita Suicide Case : संचिता उगले आत्महत्या प्रकरणात आता नव्हे वळण ; मैत्रिणीने सांगितलं एक नवीन सत्य

मुंबई : टीव्हीविश्वात निवडक भूमिका केलेल्या २२ वर्षांच्या संचिता उगलेने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी

Malnourished children : तीव्र कुपोषित बालकांचा घसरला आलेख

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश पालघर: कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचे