धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात रविवारी पहाटे ही भीषण तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १२ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेतीने भरलेल्या डंपरने एका वाहनाला धडक दिली, याचवेळी मागून आलेली ट्रॅव्हल्स वाहन जोरदार धडकल्याने हा तिहेरी अपघात घडला. या अपघातानंतर घाट परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मुंबई : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET-UG 2026) परीक्षेच्या वेळापत्रकात (Exam Timetable) बदल करण्यात आला ...
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लळिंग घाटातून भरधाव वेगाने जाणाऱ्या रेतीच्या डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे डंपर विरुद्ध बाजूला गेला आणि समोरून जाणाऱ्या एका वाहनावर धडकला. याचवेळी मालेगावकडून आलेले ट्रॅव्हल्स वाहन अपघातग्रस्त वाहनांवर जोरदार धडकले. ही धडक इतकी भीषण होती की वाहनांचा अक्षरशः चुराडा झालाय.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महामार्ग पोलीस, तसेच टोल नाक्यावरील मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे बचावकार्य राबविण्यात आले. गंभीर जखमींना उपचारासाठी धुळे येथील शासकीय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांची आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लातूर : NEET पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनीषा हवालदार हिच्या अटकेनंतर तपासाचा वेग वाढला ...
दरम्यान, अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी लळिंग टोल नाक्यावर आंदोलन सुरू करत टोल वसुली बंद पाडली. “आम्हाला कोणतीही सुरक्षा नाही, विमा संरक्षण नाही, तरीही आम्ही जीव धोक्यात घालून अपघातग्रस्तांना मदत करतो.आमच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक सुविधा व सुरक्षा पुरवायला हवी होती,” असा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अपघातानंतर लळिंग घाट परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.