Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’ प्रकरणावर अतिशय भावनिक प्रतिक्रिया देऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत (Suryakant) यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ या वादग्रस्त मुद्द्यावर याचिकाकर्त्यांना अतिशय भावनिक प्रतिक्रिया देऊ नये, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. या प्रकरणावर लवकर सुनावणी व्हावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयात आज म्हणजेच सोमवार २५ मे रोजी चर्चा झाली.


सुनावणीदरम्यान वकील एन. के. गोस्वामी यांनी युक्तिवाद करताना सरन्यायाधीशांच्या पूर्वीच्या एका ‘झुरळ’ संदर्भातील वक्तव्याचा उल्लेख केला. न्यायव्यवस्थेविषयी चुकीची माहिती पसरवली जात असून, हेतुपुरस्सर बदनामी केली जात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.



मात्र, यावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले की, “हे इतके भावनिकतेने घेऊ नका.” तसेच या प्रकरणात तातडीची कोणतीही गरज नसून, सर्वोच्च न्यायालय नियमांनुसार योग्य वेळी सुनावणी करेल, असेही त्यांनी नमूद केले.


ही जनहित याचिका न्यायालयीन संवादांचा व्यावसायिक वापर थांबवावा आणि बनावट पदवीधारक वकिलांवर केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी घेऊन दाखल करण्यात आली होती. याशिवाय, ‘कॉकरोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक ऑनलाइन मोहिमेविरोधातही सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.


‘कॉकरोच जनता पार्टी’ हा वाद काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान झालेल्या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला. न्यायालयात ऑनलाइन सक्रियतेच्या नावाखाली व्यवस्थेवर टीका करणाऱ्यांना “झुरळांसारखे” असे वर्णन करण्यात आले होते, अशी चर्चा नंतर सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर या वक्तव्यावर आधारित व्यंगात्मक मोहिमाही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली.



दरम्यान, न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाकडे कायदेशीर प्रक्रियेच्या चौकटीत पाहावे, असे संकेत देत तातडीच्या हस्तक्षेपास नकार दिला आहे.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.


या घटनेमागे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत असून घरगुती वाद, मानसिक ताण किंवा आर्थिक विवंचना या कारणांमधून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आणि दुःख व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या