Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’ प्रकरणावर अतिशय भावनिक प्रतिक्रिया देऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत (Suryakant) यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ या वादग्रस्त मुद्द्यावर याचिकाकर्त्यांना अतिशय भावनिक प्रतिक्रिया देऊ नये, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. या प्रकरणावर लवकर सुनावणी व्हावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयात आज म्हणजेच सोमवार २५ मे रोजी चर्चा झाली.


सुनावणीदरम्यान वकील एन. के. गोस्वामी यांनी युक्तिवाद करताना सरन्यायाधीशांच्या पूर्वीच्या एका ‘झुरळ’ संदर्भातील वक्तव्याचा उल्लेख केला. न्यायव्यवस्थेविषयी चुकीची माहिती पसरवली जात असून, हेतुपुरस्सर बदनामी केली जात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.



मात्र, यावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले की, “हे इतके भावनिकतेने घेऊ नका.” तसेच या प्रकरणात तातडीची कोणतीही गरज नसून, सर्वोच्च न्यायालय नियमांनुसार योग्य वेळी सुनावणी करेल, असेही त्यांनी नमूद केले.


ही जनहित याचिका न्यायालयीन संवादांचा व्यावसायिक वापर थांबवावा आणि बनावट पदवीधारक वकिलांवर केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी घेऊन दाखल करण्यात आली होती. याशिवाय, ‘कॉकरोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक ऑनलाइन मोहिमेविरोधातही सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.


‘कॉकरोच जनता पार्टी’ हा वाद काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान झालेल्या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला. न्यायालयात ऑनलाइन सक्रियतेच्या नावाखाली व्यवस्थेवर टीका करणाऱ्यांना “झुरळांसारखे” असे वर्णन करण्यात आले होते, अशी चर्चा नंतर सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर या वक्तव्यावर आधारित व्यंगात्मक मोहिमाही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली.



दरम्यान, न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाकडे कायदेशीर प्रक्रियेच्या चौकटीत पाहावे, असे संकेत देत तातडीच्या हस्तक्षेपास नकार दिला आहे.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.


या घटनेमागे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत असून घरगुती वाद, मानसिक ताण किंवा आर्थिक विवंचना या कारणांमधून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आणि दुःख व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून