Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’ प्रकरणावर अतिशय भावनिक प्रतिक्रिया देऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत (Suryakant) यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ या वादग्रस्त मुद्द्यावर याचिकाकर्त्यांना अतिशय भावनिक प्रतिक्रिया देऊ नये, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. या प्रकरणावर लवकर सुनावणी व्हावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयात आज म्हणजेच सोमवार २५ मे रोजी चर्चा झाली.


सुनावणीदरम्यान वकील एन. के. गोस्वामी यांनी युक्तिवाद करताना सरन्यायाधीशांच्या पूर्वीच्या एका ‘झुरळ’ संदर्भातील वक्तव्याचा उल्लेख केला. न्यायव्यवस्थेविषयी चुकीची माहिती पसरवली जात असून, हेतुपुरस्सर बदनामी केली जात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.



मात्र, यावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले की, “हे इतके भावनिकतेने घेऊ नका.” तसेच या प्रकरणात तातडीची कोणतीही गरज नसून, सर्वोच्च न्यायालय नियमांनुसार योग्य वेळी सुनावणी करेल, असेही त्यांनी नमूद केले.


ही जनहित याचिका न्यायालयीन संवादांचा व्यावसायिक वापर थांबवावा आणि बनावट पदवीधारक वकिलांवर केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी घेऊन दाखल करण्यात आली होती. याशिवाय, ‘कॉकरोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक ऑनलाइन मोहिमेविरोधातही सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.


‘कॉकरोच जनता पार्टी’ हा वाद काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान झालेल्या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला. न्यायालयात ऑनलाइन सक्रियतेच्या नावाखाली व्यवस्थेवर टीका करणाऱ्यांना “झुरळांसारखे” असे वर्णन करण्यात आले होते, अशी चर्चा नंतर सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर या वक्तव्यावर आधारित व्यंगात्मक मोहिमाही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली.



दरम्यान, न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाकडे कायदेशीर प्रक्रियेच्या चौकटीत पाहावे, असे संकेत देत तातडीच्या हस्तक्षेपास नकार दिला आहे.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.


या घटनेमागे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत असून घरगुती वाद, मानसिक ताण किंवा आर्थिक विवंचना या कारणांमधून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आणि दुःख व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय