- ९९ टक्के जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत
मुंबई : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती सर्वच्या सर्व १७ जागांवर निर्भेळ यश मिळवेल, असा दावा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सोमवारी केला आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. तिन्ही पक्षांचे ९९ टक्के जागांवर एकमत झाले असून, लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. (Chandrashekhar Bawankule)
विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात एकत्रित बसून मार्ग काढू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान ...
महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे. दिल्लीतील केंद्रीय समिती ज्या दिवशी या नावांवर शिक्कामोर्तब करेल, ती नावे अंतिम होतील. महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असून ९९ टक्के जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. (Chandrashekhar Bawankule)
नाशिक : नाशिकरोड परिसरातील कारागृह अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर रात्री उशिरापर्यंत मद्यपार्टी रंगल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष ...
चंद्रपुरातील काँग्रेस नगरसेवक गेले कुठे?
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत आरोपी मनीषा हवालदार यांना अटक केली आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस ...
काँग्रेस हा जनादेश संपलेला पक्ष :
- काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना ते म्हणाले, "काँग्रेस हा जनादेश संपलेला पक्ष आहे. केवळ नकारात्मकता पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात देशावर कशी हुकूमशाही लादली, याची हजारो उदाहरणे आहेत."
- दरम्यान, राज्यातील पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रशासनाने योग्य खबरदारी घेतल्यास राज्यात कुठेही इंधनाची टंचाई भासणार नाही. (Chandrashekhar Bawankule)