Monsoon 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी टाळा; कृषी विद्यापीठाचा इशारा

मुंबई : राज्यातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या २९ मेपर्यंत राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे वेगाने पुढे सरकत असल्याने महाराष्ट्रात मान्सून नेहमीपेक्षा काही दिवस आधी दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Monsoon 2026)


मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी पेरणी करताना घाई करू नये, असा महत्त्वाचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिला आहे. हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, शेतात किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास बी उगवणीत अडचणी निर्माण होऊन दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. (Monsoon 2026)



हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा मान्सूनची वाटचाल अनुकूल असून जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील तापमानातही घट होणार असून उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. (Monsoon 2026)


दरम्यान, मान्सूनपूर्व पाऊस अनेकदा वादळी स्वरूपाचा असतो. त्यामुळे काही भागांत जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतात काम करताना तसेच बाहेर प्रवास करताना नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. विशेषतः वीज कडकडाटाच्या वेळी झाडाखाली उभे राहणे टाळावे आणि पाळीव प्राण्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असेही सांगण्यात आले आहे. (Monsoon 2026)



मुंबईसह राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दादरमधील शिवाजी पार्क परिसरासह अनेक भागांत हलक्या सरी कोसळल्या असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (Monsoon 2026)


दरम्यान, राज्यातील धरणांतील पाणीसाठ्याची स्थितीही चिंतेचीच आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये एकूण ३०.५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जायकवाडी धरणात ३७ टक्के, खडकवासला धरणात ५७.४७ टक्के, तर कोयना धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. (Monsoon 2026)

Comments
Add Comment

NEET-2026 Paper Leak Case : ‘होय, मीच NEET पेपर फोडला!’; आरोपी मनीषा हवालदारची CBI समोर धक्कादायक कबुली, NTA अधिकाऱ्याचं नावही उघड?

पुणे : देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर फुटी प्रकरणात आता सर्वात मोठा स्फोटक खुलासा समोर आला आहे. या

Pune Accident : सिंहगड किल्ल्यावरून परतताना अपघात; दुचाकी दरीत पडली, तरुण-तरुणी गंभीर जखमी

पुणे : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध सिंहगड (Sinhagad) किल्ला परिसरात एक भीषण अपघात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सिंहगड

Latur : शिवराज मोटेगावकरांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस; अनधिकृत बांधकाम प्रकरण तापले

लातूर : लातूर ग्रामीणमधील खोपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११४ मधील बांधकाम प्रकरणी विकासक Shivraj Motegaonkar यांना

Latur : लातूरच्या ‘ट्युशन एरिया’वर प्रशासनाचा मोठा घाव; अनधिकृत व्यवसाय बंद करण्याचे आदेश

लातूर : लातूरच्या शिक्षण व्यवसायावर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर

Gadchiroli : गडचिरोलीत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त करण्याच्या दिशेने पोलिसांनी आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. ‘ऑपरेशन

Maharashtra HSC Marksheet Date : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! ‘या’ तारखेपासून मिळणार मूळ गुणपत्रिका

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची