EBOLA Disease : इबोलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा नागरिकांना सल्ला; काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळा

नवी दिल्ली : इबोला प्रभावित देशांतील बदलती परिस्थिती आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शिफारशी लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. काँगो, युगांडा तसेच त्यांच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण सुदान आणि इतर देशांमध्ये हा आजार पसरण्याचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. (EBOLA Disease)



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा सल्ला जारी केला आहे. या सल्ल्यानुसार, सध्या या देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सार्वजनिक आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि अतिरिक्त खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन समितीने २२ मे रोजी प्रवेशबिंदूंवरील रोगनियंत्रण आणि देखरेख अधिक मजबूत करण्यासाठी काही तात्पुरत्या शिफारशी जारी केल्या आहेत. या शिफारशींमध्ये ‘बुंडिबुग्यो विषाणू आढळलेल्या भागांमध्ये प्रवास टाळावा’ असा सल्लाही देण्यात आला आहे. (EBOLA Disease)



भारतात बुंडिबुग्यो विषाणू स्ट्रेनमुळे होणाऱ्या इबोला आजाराचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. इबोला हा एक विषाणूजन्य रक्तस्रावी तापाचा आजार असून तो इबोला विषाणूच्या ‘बुंडिबुग्यो’ स्ट्रेनमुळे होतो. हा अत्यंत गंभीर आजार असून त्यामध्ये मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या बुंडिबुग्यो स्ट्रेनमुळे होणाऱ्या इबोला आजाराच्या प्रतिबंधासाठी किंवा उपचारासाठी कोणतीही लस अथवा विशेष उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आलेली नाही. (EBOLA Disease)



जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम २००५ अंतर्गत १७ मे रोजी या परिस्थितीला ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केले होते. आफ्रिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानेही डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामध्ये पसरलेल्या बुंडिबुग्यो स्ट्रेन इबोला विषाणूच्या सध्याच्या उद्रेकाला अधिकृतपणे ‘खंडीय सुरक्षेशी संबंधित सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केले आहे. (EBOLA Disease)

Comments
Add Comment

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने

Indus Waters Treaty : दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित

नवी दिल्ली : भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर आणि सीमापार दहशतवादाला मिळणाऱ्या

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतातील इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला (Child sexual abuse) प्रोत्साहन देणाऱ्या कथित आक्षेपार्ह