Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी सुरू केलेल्या मदत क्रमांकामुळे यावर्षी नागरिकांची शंभर कोटी रुपयांहून अधिक रक्कम भामट्यांच्या खात्यात वर्ग होण्यापासून रोखण्यात यश आले आहे. तर गेल्या चार वर्षांत फसवणुकीचे ४९१ कोटी रुपये गोठवून पोलिसांनी नागरिकांना दिलासा दिला.



गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार विविध मार्गाने सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारून लाखो रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेत आहेत. याच फसवणुकीला आळा घालण्यासाठी २०२२ पासून मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मदत क्रमांक १९३० सुरू केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिक या मदत क्रमांकावर संपर्क साधत असून मदत क्रमांकावर नागरिकांची तक्रार येताच पोलीस तत्काळ कारवाईला सुरुवात करीत आहेत. परिणामी, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.



सायबर पोलिसांच्या या मदत क्रमांकावर जानेवारी २०२६ ते १९ मे २०२६ या कालावधीत फसवणूक झालेल्या २ लाख ५५ हजार ९२ नागरिकांनी तक्रारी केल्या. यापैकी ३० हजार ३०२ जणांच्या बँक खात्यामधील रक्कम इतर खात्यात जाण्यापूर्वीच पोलिसांनी रोखली.



ही रक्कम १०१ कोटी ३९ लाख ६ हजार ५५६ रुपये इतकी आहे. तर मे २०२२ ते मे २०२६ या चार वर्षांमध्ये आरोपींच्या बँक खात्यातील एकूण ४९१ कोटी ५७ लाख ८० हजार ७७९ रुपये इतकी रक्कम गोठवण्यात सायबर पोलिसांना यश आले.



पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय अलगुर, पोलीस उपनिरीक्षक पूनम जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. नागरिकांनी फसवणूक झाल्यानंतर घाबरून न जाता तत्काळ मदत क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर

वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

आ. रोहित पवार यांचा दावा; आजोबा आणि आत्याला दिला इशारा मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई :

EL Nino effects to Kharif : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल-निनो’चे सावट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला फटका बसण्याची शक्यता मुंबई : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल-निनो’चे