KKR vs MI : KKR च्या विजयाने राजस्थानचं टेन्शन वाढलं, प्लेऑफचं गणित पुन्हा बदललं

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL) काल झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सचा (MI) ४ विकेट्स राखून पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला जिवंत ठेवले आहे. या विजयामुळे केवळ KKR चा आत्मविश्वास वाढलेला नाही, तर राजस्थान रॉयल्ससह अनेक संघांची समीकरणंही पूर्णपणे बदलली आहेत.



प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १४८ धावांपर्यंत मजल मारली होती. मुंबईकडून काही फलंदाजांनी सुरुवात चांगली केली, मात्र KKR च्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये अचूक मारा करत मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. त्यामुळे मुंबईला निर्धारित षटकांत १४८ धावांवर समाधान मानावं लागलं.


१४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. फिन अॅलेन अवघ्या ८ धावांवर बाद झाला आणि KKR ला पहिला धक्का बसला. त्यानंतर मनीष पांडे मैदानात आला आणि त्याने अजिंक्य रहाणेसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रहाणे चांगल्या लयीत दिसत असतानाच तो २१ धावांवर बाद झाला.



रहाणेनंतर कॅमरून ग्रीनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तोही केवळ ४ धावांवर माघारी परतला. त्यामुळे KKR ची अवस्था ५४ धावांत ३ बाद अशी झाली होती आणि मुंबई इंडियन्स सामन्यावर पकड मजबूत करताना दिसत होती.


अशा कठीण परिस्थितीत मनीष पांडे आणि रोवमन पॉवेल यांनी जबाबदारी स्वीकारत संघाचा डाव सावरला. दोघांनी संयमी पण आक्रमक फलंदाजी करत KKR ला पुन्हा सामन्यात आणलं. मनीष पांडेने ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर रोवमन पॉवेलने ४० धावांचं योगदान दिलं. मात्र या दोघांचे विकेट्स झटपट पडल्याने सामना पुन्हा रंगतदार झाला.



शेवटच्या टप्प्यात रिंकू सिंह आणि तेजस्वी दहियाने शांतपणे खेळ करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. अखेर रिंकू सिंहने शानदार चौकार ठोकत KKR ला ४ विकेट्सने संस्मरणीय विजय मिळवून दिला.


या विजयासह KKR चे आता १३ सामन्यांत १३ गुण झाले असून संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे या विजयामुळे प्लेऑफची शर्यत आणखी रोमांचक बनली आहे. KKR चा अजून एक सामना बाकी असून तो जिंकला तर त्यांचे १५ गुण होतील आणि चौथ्या स्थानासाठी त्यांचा मजबूत दावा निर्माण होईल.



सध्या चौथ्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचे १३ सामन्यांत १४ गुण आहेत. राजस्थानने अखेरचा सामना गमावला आणि KKR ने आपला शेवटचा सामना जिंकला, तर कोलकाता थेट प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. मात्र त्यासाठी पंजाब, चेन्नई आणि दिल्ली यांच्याही पराभवाची KKR ला प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे KKR च्या या मोठ्या विजयाने राजस्थान रॉयल्सची धाकधुक वाढली असून प्लेऑफचं संपूर्ण चित्रच बदलून गेलं आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Riyan Parag :‘मी काहीही केलं तरी…’ रियान परागचा संताप अनावर; समालोचकांनाही दिला थेट इशारा

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या

WTC Points Table : बांगलादेशने चारली पाकिस्तानला धूळ; WTC टेबलमध्ये खळबळ, भारतालाही मोठा झटका

Mumbai : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या म्हणजेच WTC च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तुलनेनं दुबळ्या

FIFA World Cup 2026: २०२६ फिफा वर्ल्ड कपसाठी पोर्तुगालचा संघ जाहीर; अखेरच्या स्वप्नासाठी रोनाल्डो सज्ज

Portugal : फिफा वर्ल्ड कप २०२६ साठी पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघटनाने अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व

MI VS KKR : मुंबई विरुद्ध केकेआर मध्ये हायव्होल्टेज लढत; प्लेऑफसाठी KKR ला विजय आवश्यक; हार्दिक पांड्याचे पुनरागमन ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज 65 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना Eden Gardens