Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळतात. अशातच आता स्वतः विराटने यावर भाष्य करताना म्हंटल की भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना ९ वर्षांत कुणी नाही विचारले की तू कसा आहेस? आरसीबी इनोवेशन लॅबमध्ये बोलताना कोहलीने त्याच्या कर्णधारपदाच्या दिवसातल्या आठवणी आणि आपल्या मानसिक स्थितीबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.



नेमकं काय म्हणाला विराट ?


मी पूर्णपणे थकलो होतो. संघाची फलंदाजी आणि कर्णधारपदाचा ताण दोन्ही माझ्यावर होते. भारतीय क्रिकेटला सर्वोच्च स्थानावर ठेवण्याच्या ध्यासामुळे मी स्वतःकडे लक्षच दिले नाही. तो पुढे म्हणाला की कर्णधारपद सोडेपर्यंत तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला होता.


कर्णधारपद म्हणजे फक्त निर्णय नव्हे


कोहलीने सांगितले की कर्णधारपद म्हणजे फक्त मैदानावरील निर्णय घेणे नसते. खेळाडूंना समजून घेणे, त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे आणि संघाची मानसिकता सांभाळणे हीही मोठी जबाबदारी असते. तुम्ही सतत अशा मानसिक स्थितीत असता की स्वतःबद्दल विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. गेल्या जवळपास ९ वर्षांत कुणीही मला विचारले नाही की ‘तू कसा आहेस? असे कोहलीने सांगितले.


2014 मध्ये पहिल्यांदा मिळाले नेतृत्व


2014 मध्ये MS Dhoni दुखापतीमुळे बाहेर असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध Adelaide Oval येथे झालेल्या कसोटीत कोहलीने प्रथमच भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर 2015 मध्ये तो कायमस्वरूपी कसोटी कर्णधार बनला होता.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर कोहलीने जानेवारी १५ २०२२ रोजी अचानक कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली होती.


कोहली-शास्त्री जोडीचा सुवर्णकाळ


रवि शास्त्री आणि कोहली यांच्या जोडीने भारतीय कसोटी क्रिकेटला नवी उंची मिळवून दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवत Border-Gavaskar Trophy जिंकली. कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला. त्याने 68 कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी 40 सामने जिंकले, तर त्याचा विजयाचा टक्का 58.82 इतका प्रभावी राहिला.

Comments
Add Comment

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील

Garib Nagar Demolition Day 2 : मोठी बातमी! वांद्र्यातील गरीब नगरमध्ये तणाव; पोलिसांवर बाटल्या फेकल्यानंतर लाठीचार्ज, कारवाई मात्र सुरूच राहणार

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व (Bandra East) परिसरातील 'गरीब नगर' (Garib Nagar) भागात सलग दुसऱ्या दिवशी तणावाचे वातावरण पाहायला

विधान परिषदेच्या निवडणुका महायुती एकत्रितच लढणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; घबराट पसरवून पेट्रोल-डिझेलच्या पुरवठा साखळीत व्यत्यय आणू नये मुंबई : "विधान परिषद