Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळतात. अशातच आता स्वतः विराटने यावर भाष्य करताना म्हंटल की भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना ९ वर्षांत कुणी नाही विचारले की तू कसा आहेस? आरसीबी इनोवेशन लॅबमध्ये बोलताना कोहलीने त्याच्या कर्णधारपदाच्या दिवसातल्या आठवणी आणि आपल्या मानसिक स्थितीबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.



नेमकं काय म्हणाला विराट ?


मी पूर्णपणे थकलो होतो. संघाची फलंदाजी आणि कर्णधारपदाचा ताण दोन्ही माझ्यावर होते. भारतीय क्रिकेटला सर्वोच्च स्थानावर ठेवण्याच्या ध्यासामुळे मी स्वतःकडे लक्षच दिले नाही. तो पुढे म्हणाला की कर्णधारपद सोडेपर्यंत तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला होता.


कर्णधारपद म्हणजे फक्त निर्णय नव्हे


कोहलीने सांगितले की कर्णधारपद म्हणजे फक्त मैदानावरील निर्णय घेणे नसते. खेळाडूंना समजून घेणे, त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे आणि संघाची मानसिकता सांभाळणे हीही मोठी जबाबदारी असते. तुम्ही सतत अशा मानसिक स्थितीत असता की स्वतःबद्दल विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. गेल्या जवळपास ९ वर्षांत कुणीही मला विचारले नाही की ‘तू कसा आहेस? असे कोहलीने सांगितले.


2014 मध्ये पहिल्यांदा मिळाले नेतृत्व


2014 मध्ये MS Dhoni दुखापतीमुळे बाहेर असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध Adelaide Oval येथे झालेल्या कसोटीत कोहलीने प्रथमच भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर 2015 मध्ये तो कायमस्वरूपी कसोटी कर्णधार बनला होता.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर कोहलीने जानेवारी १५ २०२२ रोजी अचानक कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली होती.


कोहली-शास्त्री जोडीचा सुवर्णकाळ


रवि शास्त्री आणि कोहली यांच्या जोडीने भारतीय कसोटी क्रिकेटला नवी उंची मिळवून दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवत Border-Gavaskar Trophy जिंकली. कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला. त्याने 68 कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी 40 सामने जिंकले, तर त्याचा विजयाचा टक्का 58.82 इतका प्रभावी राहिला.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ'

मुंबई(Mumbai) : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ

Ashadhi Wari Special Train : आषाढी वारीसाठी रेल्वेची मोठी भेट! CSMT–मिरज दरम्यान आणखी २ विशेष 'वन-वे' गाड्या; २३ जुलैपासून आरक्षण सुरू

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ४४ हजार कोटींच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ची अंमलबजावणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; आधुनिक, स्वावलंबी शहरे घडविणार मुंबई(Mumbai) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Railone App : पश्चिम रेल्वेचे प्रवाशांना 'रेलवन' अॅप वापरण्याचे आवाहन

मुंबई : रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, स्मार्ट आणि डिजिटल करण्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांना

CM Medical Assistance Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत; बाल रुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच आर्थिक सहाय्य

त्रिपक्षीय करारातून राज्यातील २०० बालरुग्णांना मिळणार

Ashish Shelar : दशावतार कलेला राजाश्रय दिल्याबद्दल कलाकारांनी घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

- आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळाल्याची भावना मुंबई : राज्याश्रयापासून वर्षानुवर्षे दूर