Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळतात. अशातच आता स्वतः विराटने यावर भाष्य करताना म्हंटल की भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना ९ वर्षांत कुणी नाही विचारले की तू कसा आहेस? आरसीबी इनोवेशन लॅबमध्ये बोलताना कोहलीने त्याच्या कर्णधारपदाच्या दिवसातल्या आठवणी आणि आपल्या मानसिक स्थितीबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.



नेमकं काय म्हणाला विराट ?


मी पूर्णपणे थकलो होतो. संघाची फलंदाजी आणि कर्णधारपदाचा ताण दोन्ही माझ्यावर होते. भारतीय क्रिकेटला सर्वोच्च स्थानावर ठेवण्याच्या ध्यासामुळे मी स्वतःकडे लक्षच दिले नाही. तो पुढे म्हणाला की कर्णधारपद सोडेपर्यंत तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला होता.


कर्णधारपद म्हणजे फक्त निर्णय नव्हे


कोहलीने सांगितले की कर्णधारपद म्हणजे फक्त मैदानावरील निर्णय घेणे नसते. खेळाडूंना समजून घेणे, त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे आणि संघाची मानसिकता सांभाळणे हीही मोठी जबाबदारी असते. तुम्ही सतत अशा मानसिक स्थितीत असता की स्वतःबद्दल विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. गेल्या जवळपास ९ वर्षांत कुणीही मला विचारले नाही की ‘तू कसा आहेस? असे कोहलीने सांगितले.


2014 मध्ये पहिल्यांदा मिळाले नेतृत्व


2014 मध्ये MS Dhoni दुखापतीमुळे बाहेर असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध Adelaide Oval येथे झालेल्या कसोटीत कोहलीने प्रथमच भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर 2015 मध्ये तो कायमस्वरूपी कसोटी कर्णधार बनला होता.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर कोहलीने जानेवारी १५ २०२२ रोजी अचानक कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली होती.


कोहली-शास्त्री जोडीचा सुवर्णकाळ


रवि शास्त्री आणि कोहली यांच्या जोडीने भारतीय कसोटी क्रिकेटला नवी उंची मिळवून दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवत Border-Gavaskar Trophy जिंकली. कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला. त्याने 68 कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी 40 सामने जिंकले, तर त्याचा विजयाचा टक्का 58.82 इतका प्रभावी राहिला.

Comments
Add Comment

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्ग

सार्वजनिक वाहतूक दिवसानिमित्त अ‍ॅक्वा लाईनच्या प्रवाशांसाठी बीकेसी मध्ये मोफत फीडर बस सेवा मुंबई: मुंबई

Yogesh Kadam : मुंबई लोकलच्या महिला डब्यात आता रात्री ९ ते सकाळी ८ पर्यंत पोलीस

गर्दुल्ल्यांचा उपद्रव आणि ड्रग्सबाबत २५ दिवसांत निर्णय - गृहराज्यमंत्री योगेश कदम मुंबई : महिला प्रवाशांच्या

Asha Bhosle : राज्यात स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार - आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्रातील गायन-संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम

Girish Mahajan : 'गरज असेल तरच घराबाहेर पडा!' मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचे नागरिकांना मोठे आवाहन

मुंबई : राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस सुरू आहे. विशेषतः मुंबईत

ST NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा जबरदस्त प्रतिसाद; ६२.८६ लाखांनी केली नोंदणी

- १ ऑगस्टपासून मोठा बदल मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)

Sakinaka Manhole Accident : मोबाईलवर बोलणं जीवावर बेतलं! साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. खैराणी रोडवरील सन्मान