Mangrove Park in Gorai : गोराईत राज्याच्या पहिल्या 'कांदळवन पार्क'चे २८ मे रोजी उद्घाटन; निसर्गप्रेमींना मिळणार विरंगुळ्याचे नवे ठिकाण

मुंबई : अनेक दिवसांच्या आणि वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा शोधण्याची एक मोठी संधी मिळणार आहे. बोरीवलीतील गोराई (Gorai) येथे साकारण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिलेवहिले 'कांदळवन पार्क' (Mangrove Park) येत्या २८ मे रोजी नागरिकांसाठी खुले होणार आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) यांनी अधिकृत माहिती दिली असून, गुरुवारी सकाळी १० वाजता या बहुप्रतिक्षित प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.



या नयनरम्य प्रकल्पाला 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpeyi) कांदळवन पार्क' असे नाव देण्यात आले आहे. या पार्कचे रीतसर उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या शुभहस्ते होणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार, राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती असेल. विशेष म्हणजे, या प्रकल्पाची पायाभरणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात, २०२१ मध्ये तत्कालीन पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने झाली होती. ८ हेक्टरच्या विस्तृत जागेवर पसरलेल्या या पार्कचे काम जवळपास वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले होते. मात्र, उद्घाटनाच्या तारखा अनेकदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे ते सर्वसामान्यांसाठी बंदच होते. आता उद्घाटनाचा मुहूर्त सापडल्याने पर्यटकांचा मार्ग मोकळा झाला आहे.



कांदळवन पार्कची प्रमुख वैशिष्ट्ये आणि आकर्षणे


मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात हे नवीन पार्क 'पर्यावरण-पर्यटन' वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या पार्कची रचना पर्यटकांना किनारी परिसंस्थेची (Coastal Ecosystem) जवळून ओळख करून देण्यासाठी केली गेली आहे. या पार्कचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ७५० मीटर लांबीचा उंचावर बांधलेला चालण्याचा मार्ग (Elevated Boardwalk). विशेष म्हणजे, हा मार्ग तयार करताना एकाही कांदळवनाची कत्तल करण्यात आलेली नाही. या मार्गावरून चालताना पर्यटकांना थेट खाडीकिनारी उभारलेल्या 'व्ह्यूइंग डेक'पर्यंत पोहोचता येईल. निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठी येथे तब्बल १८ मीटर उंचीचा एक 'बर्डवॉचिंग टॉवर' उभारण्यात आला आहे. पर्यटकांना कांदळवनाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी दोन मजली 'नेचर इंटरप्रिटेशन सेंटर' तयार करण्यात आले आहे. यात सुसज्ज ग्रंथालय, विविध कार्यशाळांसाठी जागा, कॅफे, आकर्षक रूफटॉप रेस्टॉरंट आणि भेटवस्तूंचे दुकान (Gift Shop) अशा उत्तम सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

TET paper Case : TET पेपरफुटीच्या मास्टरमाइंडला अखेर बेड्या! ठाणे पोलिसांनी बिहारमध्ये केली करावाई

भिवंडी : महाराष्ट्रातील गाजलेल्या टीईटी (TET) पेपरफुटी प्रकरणात (TET paper Case) ठाणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या

BHARAT TAXI : मुंबई आणि पुणेकरांसाठी 'भारत टॅक्सी' सेवा सुरू; ट्रॅफिक असो किंवा पाऊस, भाडे राहणार निश्चित!

मुंबई: कॅब चालकांची भाडे नाकारण्याची कटकट, पीक अवर्समधील अव्वाच्या सव्वा दर आणि ट्रॅफिक किंवा पावसात होणारी

Mumbai Rain : मुंबईत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७६ टक्के पडला पाऊस

मुंबई : मुंबईत (Mumbai) आतापर्यंत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७५ ते ७६ टक्के एवढ्या पावसाची (Rain) नोंद झाल्याची आकडेवारी

BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ८० टक्के शालेय साहित्याचे वाटप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळांमध्ये (Schools) शालेय विद्यार्थ्यांना (Students) दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तुंचे मोफत वाटप

BMC : तब्बल १२७८ महिलांमध्ये स्तन कर्करोगाची आढळली लक्षणे, महापालिकेच्यावतीने केला जाणार मोफत उपचार

महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली माहिती मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री

Mumbai Water Supply : मुंबईकरांचा पाणी साठा सुस्थितीत, आता प्रतीक्षा ऑगस्टमधील पावसाची

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या सर्व धरणांमधील पाणी साठा आता चांगल्याप्रकारे वाढू लागला असून