Twisha Sharma Death Case : ट्विशा मृत्यू प्रकरणात नवा खुलासा; इन्स्टाग्राम चॅटमधून समोर आली धक्कादायक वेदना

भोपाळ : भोपाळमधील ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असून आता या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. ट्विशाच्या मृत्यूपूर्वीचे दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे. अशातच आता ट्विशाचं शेवटचं इन्स्टाग्राम चॅट व्हायरल झालं असून त्यातून तिच्या मनातील वेदना आणि ती सहन करत असलेला मानसिक त्रास स्पष्टपणे समोर आला आहे.



मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी ट्विशाने तिची जवळची मैत्रीण मीनाक्षी हिच्याशी इन्स्टाग्रामवर संवाद साधला होता. या चॅटमध्ये तिने लग्नाबाबत अत्यंत भावनिक शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. “मी फसले यार… तू नको फसू. जास्त काही बोलत नाही, पण योग्य वेळ आल्यावर तुला सगळे सांगेल,” असा मेसेज ट्विशाने केला होता. तिच्या या शब्दांतून ती आतून किती खचली होती याची जाणीव होत आहे. ट्विशाचा हा मेसेज पाहून मीनाक्षीनेही चिंता व्यक्त केली होती. “मला तुझी खूप काळजी वाटतेय. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,” असं उत्तर तिने दिलं होतं.


दरम्यान, याआधी ट्विशाचे व्हॉट्सअॅप चॅट्सही समोर आले होते. मृत्यूच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वी तिने आई-वडिलांना पाठवलेल्या मेसेजमध्ये गंभीर आरोप केले होते. “मी फार त्रस्त आहे. हे लोक अत्यंत वाह्यात आणि नीच आहेत. माझ्यावर सतत संशय घेतला जातो. माझ्या पोटात कुणाचं मूल आहे? असे प्रश्न समर्थ विचारतो. तुम्ही या आणि मला घेऊन जा. हे लोक मला जगू देणार नाहीत,” असा धक्कादायक दावा ट्विशाने केला होता. या मेसेजमधून सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाची माहिती तिने दिली होती.



मिळालेल्या माहितीनुसार, नोएडामध्ये राहणाऱ्या ट्विशा शर्माचं डिसेंबर २०२५ मध्ये निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांचा मुलगा आणि पेशाने वकील असलेल्या समर्थ सिंह याच्यासोबत लग्न झालं होतं. दोघांची ओळख मॅट्रिमोनियल साईट आणि डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. मात्र काही दिवसांनंतर ट्विशाला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलं, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.


लग्नानंतर काही काळातच ट्विशाचा गर्भपात झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानंतर तिची मानसिक अवस्था अधिक खालावल्याचं सांगितलं जात आहे. अखेर १२ मे २०२६ रोजी रात्री भोपाळमधील कटारा हिल्स परिसरातील घरात ट्विशाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. मात्र पोस्टमॉर्टेम अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.


गळफासामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं असलं तरी ट्विशाच्या शरीरावर अनेक जखमांचे निशाण आढळून आल्याने संशय अधिक गडद झाला आहे. त्यामुळे मृत्यूपूर्वी तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं? तिला मारहाण करण्यात आली होती का? तिच्यावर आणखी कोणता दबाव होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून ट्विशाच्या मृत्यूमागील खरं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : मला खंत नाही, मी शांत आहे’; मंत्री छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य

Chhagan Bhujbal News : राज्यसभेची संधी हुकल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीररित्या नाराजीचा सूर आळवला होता.

UBT Sena : ऑपरेशन टायगर’च्या भीतीने उबाठाकडून मातोश्रीवर बैठकांचे सत्र

सर्व खासदारांना निमंत्रण; पडद्यामागे हालचालींना वेग मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची

Pranit More - Sejal Pawar Controversy : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी MBBS ची विद्यार्थिनी सेजल पवार सक्तीच्या रजेवर, चौकशी सुरू - माहिती

मुंबई : स्टॅन्ड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या कार्यक्रमाचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Ind Vs Pak Womens T-20 World Cup : भारतीय संघाला सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे आव्हान; संघात मोठे बदल होण्याची शक्यता

बर्मिंगहॅम : भारतीय महिला संघ रविवारी(१४ जून)आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गट

Raja Shivaji : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली ?

Raja Shivaji Final Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या धमाकेदार चित्रपटांची मेजवानी एकामागोमाग एक पहायला मिळत आहे. 'राजा

Shubham Gill & Sheryas Iyer : शिखर धवनचा विक्रम धोक्यात! शुभमन गिल-श्रेयस अय्यरसमोर इतिहास रचण्याची संधी

धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि स्टार फलंदाज श्रेयस