मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत शोकाकुल आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेमुळे डहाणूतील बापूगाव गावावर दुःखाचे मोठे सावट पसरले असून, संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. या सामूहिक अंत्यविधीच्या वेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्वतः उपस्थित राहून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली व पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले.अंत्यविधीदरम्यान संपूर्ण बापूगाव आणि परिसरातील नागरिक भावुक झाले होते. ग्रामस्थांचे अश्रू थांबत नव्हते. बापूगावच्या सरपंचांनीही यावेळी अश्रूंना वाट मोकळी करून देत, या अत्यंत गरीब आणि गरजू मृत कुटुंबांना शासनाने तातडीने मोठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.



दुःखात बुडालेल्या ग्रामस्थांशी संवाद साधताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांप्रती सखोल सहानुभूती दर्शविली आहे. अपघातातील जखमींवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार केले जात असून, त्यांच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयात ये-जा करण्यासह सर्व आवश्यक सुविधा प्रशासनामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आदिवासी विकास विभाग पूर्णपणे 'पालकत्वाची' भूमिका निभावेल आणि त्यांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल.


परिसरात हळहळ


या सामूहिक अंत्यसंस्काराला मृतांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि कुटुंबीयांना धीर देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती. यामध्ये खासदार हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावीत, आमदार विनोद निकोले, माजी आमदार विलास तरे स्थानिक नेते भरत राजपूत, जिल्हाधिकारी, एटीसी अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या भीषण अपघाताने केवळ बापूगावच नव्हे, तर संपूर्ण पालघर जिल्हा हादरला आहे. पीडित कुटुंबांना या अथांग दुःखातून सावरण्यासाठी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थाही मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.

Comments
Add Comment

कोकणातील दुर्गम व डोंगराळ भागातील नेटवर्कसाठी नव्याने सर्वेक्षण; मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्कच्या समस्यांबाबत

FIFA World Cup 2026: ब्राझील व क्रोएशियाचे वर्ल्ड कप संघ जाहीर, नेमारची एन्ट्री

ब्राझीलिया : फिफा वर्ल्डकप २०२६ साठी (FIFA World Cup 2026) ब्राझील (Brazil national football team) आणि क्रोएशियाने (Croatia national football team) त्यांचे संघ जाहीर

Sandeep lamichhane : संदीप लामिछानेने केला वनडेत सर्वाधिक वेगाने १५० विकेट्स घेण्याचा विक्रम

त्रिभुवन : नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात नेपाळ विरुद्ध स्कॉटलंड या वन डे मध्ये

ॲमिटी विद्यापीठाला पनवेलमध्ये १५ एकर जमीन; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात