Vidhanparishad Elections : विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी १८ जूनला मतदान

२२ जूनला मतमोजणी; स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर


मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (१८ मे) या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १६ जागांसाठी गुरुवार, १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे संबंधित मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.


निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक घेण्यासाठी संबंधित क्षेत्रातील किमान ७५ टक्के स्थानिक संस्था कार्यरत असणे आणि ७५ टक्के मतदार (लोकप्रतिनिधी) पदावर असणे अनिवार्य असते. यापूर्वी अनेक महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या मुदती संपल्यामुळे आणि तिथे प्रशासक राजवट असल्याने हा ७५ टक्क्यांचा निकष पूर्ण होत नव्हता. परिणामी, २०२२, २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या या १६ जागांवर निवडणुका घेता आल्या नव्हत्या. आता या सर्व मतदारसंघांमध्ये आवश्यक निकष पूर्ण झाले असल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.



या जागा रिक्त


१. ठाणे : रवींद्र फाटक (निवृत्ती: ०८.०६.२०२२)
२. पुणे : अनिल शिवाजीराव भोसले (निवृत्ती: ०५.१२.२०२२)
३. नागपूर : दुष्यंत सतीश चतुर्वेदी (यवतमाळ जागा - निवृत्ती: ०५.१२.२०२२)
४. नाशिक : नरेंद्र भिकाजी दराडे (निवृत्ती: २१.०६.२०२४)
५. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत सुनील तटकरे (निवृत्ती: ३१.०५.२०२४)
६. छत्रपती संभाजी नगर -जालना : अंबादास दानवे (निवृत्ती: २९.०८.२०२५)
७. अहिल्यानागर : अरुणकाका जगताप (निवृत्ती: ०१.०१.२०२२)
८. सोलापूर : प्रशांत परिचारक (निवृत्ती: ०१.०१.२०२२)
९. जळगाव : चंदूभाई व्ही. पटेल (निवृत्ती: ०५.१२.२०२२)
१०. सांगली-सातारा : मोहनराव कदम (निवृत्ती: ०५.१२.२०२२)
११. नांदेड : अमरनाथ राजूरकर (निवृत्ती: ०५.१२.२०२२)
१२. भंडारा-गोंदिया : डॉ. परिणय रमेश फुके (निवृत्ती: ०५.१२.२०२२)
१३. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (निवृत्ती: २१.०६.२०२४)
१४. अमरावती : प्रवीण पोटे (निवृत्ती: २१.०६.२०२४)
१५. धाराशिव-लातूर-बीड : सुरेश रामचंद्र धस (निवृत्ती: २१.०६.२०२४)
१६. परभणी-हिंगोली : विप्लव बजोरिया (निवृत्ती: २१.०६.२०२४)


निवडणूक कार्यक्रम असा...


- अधिकृत अधिसूचना :२५ मे २०२६
- उमेदवारी अर्ज) अंतिम मुदत : १ जून २०२६
- उमेदवारी अर्जांची छाननी : २ जून २०२६
- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ४ जून २०२६
- मतदान : १८ जून २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत)
- मतमोजणी आणि निकाल : २२ जून २०२६


मतदार कोण?


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या जागांवर महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील निर्वाचित लोकप्रतिनिधी मतदान करतात. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, उबाठा गट, शरद पवार गट) यांच्यात या १६ जागांवर थेट आणि प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळेल. अनेक ठिकाणी संख्याबळ राखण्यासाठी आणि मतांची जुळवाजुळव करण्यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्सला वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या