डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकला कंटेनरने समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक क्रूर झडप घातली आहे. मुंबई-अहमदाबाद (Mumbai- ...
डहाणू तालुक्यातील बापू गाव (खडकीपाडा) येथील बाळाराम जयराम दांडेकर यांचा साखरपुडा धानोरी येथे आयोजित करण्यात आला होता. वऱ्हाडी ट्रकमधून जात असताना मुलीच्या घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर अपघात झाला आणि दोन्ही वाहने रस्त्यावरच उलटली. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे ...
अनेक प्रवासी ट्रकखाली अडकले होते. सुरुवातीला सर्व जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालय तसेच वापी येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. या दुर्घटनेमुळे साखरपुड्याचा आनंद क्षणात दुःखात बदलला. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नानीवली परिसरात घडलेल्या भीषण रस्ते ...
मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या धानोरी येथे एका टेम्पोला कंटेनरने धडक दिल्यामुळे झालेला हा भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे. ही घटना ऐकून मला अतिशय दुःख झाले. अपघातात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच या अत्यंत कठीण प्रसंगी राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या दुर्दैवी घटनेतील प्रत्येक मृताच्या वारसाला राज्य सरकारतर्फे ५ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चही केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
मृतांची नावे
सुरेखा सना लाखाण
पांडू गणपत लाखाण
कलू रोहिदास लाखाण
सुनील अर्जुन धोडकर
चिमा गोविंद बहेडा
नानीमा विठ्ठल धोडकर
सारिका संतोष लाखाण
आयुष विनायक लाखाण
सागर नामदेव थोडे
वंदना शिवराम वळवी
सलोनी शिवराम वळवी
उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दोन नागरिकांच्या नावांची पडताळणी प्रशासनाकडून सुरू आहे