Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकला कंटेनरने समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.






डहाणू तालुक्यातील बापू गाव (खडकीपाडा) येथील बाळाराम जयराम दांडेकर यांचा साखरपुडा धानोरी येथे आयोजित करण्यात आला होता. वऱ्हाडी ट्रकमधून जात असताना मुलीच्या घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर अपघात झाला आणि दोन्ही वाहने रस्त्यावरच उलटली. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.






अनेक प्रवासी ट्रकखाली अडकले होते. सुरुवातीला सर्व जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालय तसेच वापी येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. या दुर्घटनेमुळे साखरपुड्याचा आनंद क्षणात दुःखात बदलला. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.



मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत


मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या धानोरी येथे एका टेम्पोला कंटेनरने धडक दिल्यामुळे झालेला हा भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे. ही घटना ऐकून मला अतिशय दुःख झाले. अपघातात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच या अत्यंत कठीण प्रसंगी राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या दुर्दैवी घटनेतील प्रत्येक मृताच्या वारसाला राज्य सरकारतर्फे ५ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चही केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.


मृतांची नावे


सुरेखा सना लाखाण


पांडू गणपत लाखाण


कलू रोहिदास लाखाण


सुनील अर्जुन धोडकर


चिमा गोविंद बहेडा


नानीमा विठ्ठल धोडकर


सारिका संतोष लाखाण


आयुष विनायक लाखाण


सागर नामदेव थोडे


वंदना शिवराम वळवी


सलोनी शिवराम वळवी


उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दोन नागरिकांच्या नावांची पडताळणी प्रशासनाकडून सुरू आहे

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Devendra Fadnavis : इंधन, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देऊया!

मुंबई : "आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Underwater Tourism : सिंधुदुर्गात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग

Eknath Shinde : 'उबाठा'चे खासदार पुन्हा एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना सोमवारी पुन्हा बळ मिळाले.