घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नानीवली परिसरात घडलेल्या भीषण रस्ते अपघातात दोन मित्रांचा भीषण अंत झाला आहे. आपल्या १५ वर्षीय मित्राचा मृत्यू सहन न झाल्याने आणि मित्राला गमावल्याचे दुःख सहन न झाल्याने दुसऱ्यानेही काही मिनिटांतच टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.


भरधाव वेग आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले


मिळालेल्या माहितीनुसार, वैभव लहांगे (१५) आणि नितीन वर्था हे दोघे जिवलग मित्र होते. ते दोघेही शनिवारी पहाटे एका लग्नकार्यावरून दुचाकीने घरी परतत होते. पहाटेची वेळ असल्याने रस्ता मोकळा होता. मात्र नानीवली परिसरात त्यांच्या दुचाकीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. भरधाव वेगामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर त्यांची दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सौर ऊर्जेच्या खांबाला जाऊन धडकली. (Palghar Road Accident)


मित्राचा विरह असह्य , उचललं टोकाचं पाऊल


ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी कित्येक फूट हवेत उडाली. त्यानंतर ती जवळच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात वैभव लहांगेच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातातून बचावलेल्या नितीनला जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याने त्याचा मित्र वैभवबद्दल विचारणा केली. यावेळी त्याला वैभव आता या जगात नाही असे समजले आणि त्याला मोठा मानसिक धक्का बसला. यानंतर समोर आपल्या मित्राचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून तो पूर्णपणे खचून गेला.(Palghar Road Accident)


प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, नितीनला त्याच्या मित्राचा विरह असह्य झाला आणि याच प्रचंड मानसिक तणावातून त्याने जवळच असलेल्या एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Palghar Road Accident)


हा संपूर्ण अपघात परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, अपघातावेळी दुचाकीचा वेग किती होता आणि काही तांत्रिक बिघाड झाला होता का, याचा तपास सुरू केला आहे. मात्र एकाच गावातील दोन तरुण मुलांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने नानीवली गावात शोककळा पसरली आहे. (Palghar Road Accident)

Comments
Add Comment

आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश • मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापन राज्यस्तरीय आढावा बैठक •

Jhalmuri Shopkeeper : पंतप्रधानांना झालमुरी खाऊ घालणाऱ्या दुकानदाराला पाक-बांगलादेशातून धमक्या; कुटुंब दहशतीखाली

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झालमुरी खाऊ घातल्यानंतर चर्चेत

पेट्रोल-डिझेलच्या साठेबाजीवर बारीक लक्ष ठेवा

मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर सरकारचा ऍक्शन प्लॅन तयार मुंबई :

IPL 2026 Playoff Scenarios : 4 संघ... 4 सामने... पण तिकीट फक्त एकालाचं! IPL पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्ट

IPL 2026 Playoff Scenarios : आयपीएल 2026 आता अखेरच्या टप्प्यात आहे. प्लेऑफची शर्यत दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत आहे. आतापर्यंत 3

सुबोध मोहिते, प्रमोद हिंदुराव की अविनाश आदिक?

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीत तीन नावांवर खल; सुनेत्रा पवार करणार अंतिम शिक्कामोर्तब मुंबई :

Nashik : डिझेल टंचाईमुळे सोमवारपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद

Nashik : डिझेलची टंचाई निर्माण झाल्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या