मुंबई : सध्या IPL २०२६ चा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफमध्ये कोणते संघ स्थान मिळवणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र या दरम्यान टीम इंडियाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय कसोटी संघात मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली १९ मे रोजी गुवाहाटी येथे महत्त्वाची बैठक होणार असून त्यामध्ये काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याच्याबाबत निवड समिती गंभीर विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. कसोटी संघातील उपकर्णधारपदाची जबाबदारी पंतकडून काढून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. संघ व्यवस्थापनाचे मत असे आहे की अतिरिक्त नेतृत्वाची जबाबदारी त्याच्या नैसर्गिक खेळावर परिणाम करत आहे.
धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या विक्रमाची नोंद केली. या सामन्यात किंग ...
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुभमन गिलकडे भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. त्याचवेळी ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले. मात्र पुढील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी पंतच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडकर्त्यांना असे वाटत आहे की नेतृत्वाचा ताण त्याच्या फलंदाजीवर आणि मैदानावरील निर्णयक्षमतेवर स्पष्टपणे दिसून येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापन ऋषभ पंतसारख्या सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता असलेल्या खेळाडूवर अतिरिक्त दबाव टाकण्याच्या भूमिकेत नाही. जेव्हाही त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी आली, तेव्हा त्याच्या फलंदाजीतील आक्रमकता आणि निर्णय घेण्याच्या शैलीवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पंतने कोणत्याही अतिरिक्त तणावाशिवाय फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, अशी निवडकर्त्यांची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, नोव्हेंबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी येथे झालेल्या कसोटी सामन्यात शुभमन गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. मात्र त्या सामन्यात भारताला तब्बल ४०८ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर पंतच्या नेतृत्वशैलीवर सातत्याने टीका होत असून त्याच्या निर्णयक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ...
जर निवड समितीने ऋषभ पंतकडून उपकर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय घेतला, तर केएल राहुल हा मोठा पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. केएल राहुलला यापूर्वी भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे आणि कसोटी संघातील त्याचे स्थानही जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे गुवाहाटी येथे होणाऱ्या बैठकीत अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ निवडीसोबतच पंतच्या उपकर्णधारपदाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.




