Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train) प्रकल्पाने आणखी एक प्रतिकात्मक टप्पा गाठला आहे. देशातील या पहिल्या हायस्पीड ट्रेनचा पहिला अधिकृत फोटो (First Photo Of Mumbai-Ahmedabad Bullet Train) आता समोर आला असून, नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या 'गेट नंबर ४' वर तो मोठ्या अभिमानाने प्रदर्शित करण्यात आला आहे. हे आकर्षक चित्र देशाच्या प्रगत रेल्वे प्रवासाच्या नव्या युगाची नांदी मानले जात असून, प्रकल्पाच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे पाऊल आहे.



अवघ्या दोन तासांत गाठता येणार अहमदाबाद



महाराष्ट्र आणि गुजरात या दोन प्रमुख राज्यांना जोडणाऱ्या ५०८ किलोमीटर लांबीच्या या 'हायस्पीड रेल' कॉरिडॉरचे काम जपानच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याने अत्यंत वेगाने सुरू आहे. ताशी तब्बल ३२० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या बुलेट ट्रेनमुळे प्रवासाच्या वेळेत क्रांतीकारी बदल होणार आहे. ही ट्रेन मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथून निघून ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद आणि अहमदाबादमार्गे साबरमतीपर्यंत धावेल. सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद अशा मोजक्याच थांब्यांसह हा ५०८ किमीचा संपूर्ण प्रवास अवघ्या २ तास ७ मिनिटांत पूर्ण होईल. सध्याच्या रस्ते किंवा रेल्वे प्रवासाच्या तुलनेत हा वेग थक्क करणारा आहे.



भूसंपादनाचे विघ्न दूर आणि स्थानके प्रगतीपथावर


कोणत्याही मोठ्या प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा भूसंपादनाचा असतो. मात्र, फेब्रुवारी २०२६ मध्ये रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केल्यानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण १,३८९.५ हेक्टर जागेचे भूसंपादन १०० टक्के पूर्ण झाले असून सर्व वैधानिक परवानग्याही मिळवण्यात आल्या आहेत. यानंतर संपूर्ण कॉरिडॉरच्या बांधकामाला प्रचंड वेग आला आहे. एकूण १२ नियोजित स्थानकांपैकी गुजरातमधील वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, आनंद, वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमती या आठ स्थानकांचे पायाभरणीचे (Foundation) काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातही ठाणे, विरार आणि बोईसर येथे काम युद्धपातळीवर सुरू असून, बीकेसी येथील भूमिगत (Underground) स्थानकाचे उत्खनन जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.



१७ पुलांचे काम पूर्ण, भुयारी मार्गही मार्गी




या प्रकल्पाच्या उभारणीत भारतीय आणि जपानी अभियंत्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आतापर्यंत तब्बल १७ नद्यांवरील पुलांचे बांधकाम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, नर्मदा, तापी, माही आणि साबरमती यांसारख्या मोठ्या नद्यांवरील भव्य पुलांचे काम वेगाने सुरू आहे. तसेच ठाणे, सुरत आणि साबरमती येथे ट्रेनच्या देखभालीसाठी डेपो उभारणीचे कामही सुरू आहे. या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक टप्पा म्हणजे महाराष्ट्रातील २१ किलोमीटर लांबीचा समुद्राखालून जाणारा भुयारी मार्ग (Undersea tunnel). अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अत्यंत गुंतागुंतीच्या भुयारी मार्गाचे कामही वेगाने सुरू असून घणसोली आणि शिळफाटा दरम्यान आतापर्यंत तब्बल ४.८ किलोमीटरचे उत्खनन पूर्ण झाले आहे.



औद्योगिक विकासाला आणि कनेक्टिव्हिटीला मिळणार मोठी चालना


भारतीय रेल्वेच्या मते, हा हायस्पीड कॉरिडॉर केवळ प्रवाशांचा प्रवासच सुखकर करणार नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही नवी गती देईल. या प्रकल्पामुळे प्रमुख औद्योगिक क्षेत्रांची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर सुधारेल. विशेषतः बोईसर स्थानकामुळे आगामी काळात विकसित होत असलेल्या 'वाढवण बंदर' (Vadhvan Port) प्रकल्पाला या बुलेट ट्रेनचा खूप मोठा फायदा होणार असून, यामुळे मालवाहतूक, व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.

Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण!  हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल

Railway Security : दगडफेक करणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाची ड्रोनद्वारे करडी नजर

नवी दिल्ली : धावत्या रेल्वेगाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या