Hind Kesari : फायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळचा हात जखमी; महेंद्र गायकवाड ठरला ५२ वा 'हिंद केसरी'!

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडिअमवर पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात मानाच्या हिंद केसरी गदेकरिता रंगलेली लढत अखेर दुखापतीमुळे थांबली. सामन्यादरम्यान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अखेर माघार घ्यावी लागली. प्रतिस्पर्ध्याने माघार घेतल्यानंतर पंचांनी महेंद्र गायकवाडला ५२ व्या हिंद केसरीचा विजेता घोषित केले. विजेतेपदासोबतच महेंद्र गायकवाडला मानाची चांदीची गदा, महिंद्रा थार आणि रोख रकमेचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. तर उपविजेता ठरलेल्या पृथ्वीराज मोहोळला ट्रॅक्टर प्रदान करण्यात आला.



महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील अंतिम सामना सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीचा झाला होता. दोन्ही पैलवानांनी डाव-प्रतिडावांची आतषबाजी करत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. मात्र सामन्याच्या सुरुवातीलाच महेंद्र गायकवाडने पृथ्वीराज मोहोळचा हात जोरदार पिरगळला. या डावामुळे पृथ्वीराजच्या हाताला दुखापत झाली आणि त्यानंतर सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. पंचांनी मेडिकल टाइम दिल्यानंतर डॉक्टरांनी मैदानात येत पृथ्वीराजच्या दुखापतीची तपासणी केली.


काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर पृथ्वीराज मोहोळ पुन्हा आखाड्यात उतरला. जखमी हात असूनही त्याने सामना सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र हाताची वेदना वाढत असल्याने त्याला पूर्ण ताकदीने खेळता येत नव्हते. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पृथ्वीराज मोहोळने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंचांनी महेंद्र गायकवाडला विजेता घोषित केले आणि स्टेडिअममध्ये जल्लोष उसळला.



दरम्यान, उपांत्य फेरीत महेंद्र गायकवाडने दिल्लीच्या अनिरुद्धला ९-७ अशा फरकाने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्याची सुरुवातही अत्यंत दमदार झाली होती. महेंद्रने दुसऱ्याच मिनिटाला दुहेरी पटचा अचूक डाव टाकत दोन गुण मिळवले. त्यानंतर अनिरुद्धनेही जोरदार पुनरागमन करत दुहेरी पट लावत गुणांची बरोबरी साधली. ब्रेकनंतर महेंद्र गायकवाडने पुन्हा आक्रमक खेळ करत आणखी दोन गुण पटकावले. मात्र अनिरुद्धनेही हार न मानता प्रत्युत्तर दिले आणि सामना ४-४ अशा बरोबरीत आणला.


शेवटच्या मिनिटापर्यंत सामना अत्यंत रंगतदार स्थितीत होता. दोन्ही पैलवान एकमेकांवर सतत हल्ले करत होते. निर्णायक क्षणी महेंद्र गायकवाडने दुहेरी पटाचा अचूक डाव टाकत तब्बल चार गुणांची कमाई केली आणि सामन्यावर पकड मजबूत केली. त्यानंतर त्याने आणखी एक गुण मिळवत ९ गुणांपर्यंत मजल मारली. पराभव जवळ आलेला असतानाही अनिरुद्धने संघर्ष सुरूच ठेवला. त्याने शेवटच्या काही सेकंदांत तीन गुण मिळवत सामना ९-७ पर्यंत आणला. मात्र अखेरीस महेंद्र गायकवाडने दोन गुणांच्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली होती.


दुसऱ्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या पृथ्वीराज मोहोळने एनसीआरच्या रजतवर मात करत अंतिम फेरी गाठली होती. सामन्याच्या अवघ्या पहिल्या २० सेकंदांत पृथ्वीराजने जबरदस्त डाव टाकत दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर त्याने डबल लेग अटॅक करत आणखी दोन गुण मिळवले. पहिल्याच मिनिटात ४ गुणांची आघाडी घेत पृथ्वीराजने प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला होता. त्याच्या आक्रमक खेळामुळे रजतला सावरायलाही वेळ मिळाला नाही आणि पृथ्वीराजने दमदार कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला होता.

Comments
Add Comment

Indian Cricket Team : टीम इंडियात फेरबदलाचे संकेत; पंतकडून उपकर्णधारपद काढून घेण्याची शक्यता!

मुंबई : सध्या IPL २०२६ चा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफमध्ये कोणते संघ स्थान मिळवणार याकडे क्रिकेट

Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली