NEET Paper Leak Case : NEET निकालात ‘१८० पैकी १८०’चा दावा; नांदेडच्या क्लासवर CBIचा छापा

नांदेड : NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता महाराष्ट्रातील नांदेड शहर पुन्हा चर्चेत आले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या NEET परीक्षेतील गैरप्रकारांचा तपास सध्या केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) करत असून, हा तपास दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, लातूर यानंतर आता सीबीआयचे (CBI) पथक नांदेडमध्ये दाखल झाले असून, येथे एका खासगी कोचिंग क्लासच्या जाहिरातीमुळे संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणात संबंधित क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची सीबीआयकडून रविवारी सखोल चौकशी करण्यात आली.



नांदेडमध्ये सध्या खासगी कोचिंग क्लासेसमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लासेसकडून आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाची मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी केली जाते. मात्र, अशाच एका जाहिरातीमुळे आता एका नामांकित क्लासेसवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. संबंधित क्लासने NEET परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच एका विद्यार्थिनीने केमिस्ट्री विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवल्याचा दावा करत जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आणि त्यानंतर सीबीआयने (CBI) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.


सीबीआयच्या पथकाने चौकशी केलेल्या विद्यार्थिनीने केमिस्ट्री विषयात १८० पैकी १८० गुण मिळवल्याचा दावा जाहिरातीत करण्यात आला होता. या विद्यार्थिनीचा फोटो वापरून क्लासेसने स्वतःची प्रसिद्धी केली होती. मात्र, तपासादरम्यान या विद्यार्थिनीच्या वडिलांनी तब्बल ५ लाख रुपये देऊन NEET परीक्षेचा पेपर खरेदी केल्याचा आरोप समोर आला आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.



विशेष म्हणजे, नीट परीक्षेचा अधिकृत निकाल लागण्यापूर्वीच संबंधित क्लासने विद्यार्थिनीला पूर्ण गुण मिळाल्याचा दावा केल्यामुळे संशय अधिक गडद झाला आहे. या जाहिरातीत आणखी दोन विद्यार्थ्यांचे फोटो देखील प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे केवळ विद्यार्थिनीच नव्हे तर संबंधित कोचिंग क्लासचे चालक आणि व्यवस्थापनही तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.


दरम्यान, नीट परीक्षा पार पडल्याच्या काही दिवसांतच पेपरफुटी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला. तपासादरम्यान महाराष्ट्रातील अनेक आरोपी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील शुभम खैरनार याने नीटचा पेपर फोडल्याचा आरोप असून, त्यानंतर धनंजय लोखंडे याने विद्यार्थ्यांना तो पेपर विकल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना शोधण्याची जबाबदारी पुण्यातील ब्युटिशियन मनीषा वाघमारे हिच्याकडे होती, असा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे.


याशिवाय, लातूरमधून अटक करण्यात आलेले पी. व्ही. कुलकर्णी आणि पुण्यातून अटक झालेली मनीषा मांढरे हे दोघेही NTA च्या पेपर सेटिंग कमिटीचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनी मिळून पेपरफुटीत महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. देशभरात या पेपरफुटीच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून २५ हजार रुपयांपासून तब्बल ४० लाख रुपयांपर्यंत रक्कम उकळण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे.

Comments
Add Comment

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे