Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याचे सूत्रांकडून समजते. या भेटीत राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या अनुक्रमे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदांवर पूर्ण अधिकारांसह कायम आहेत, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात या दोन्ही नेत्यांच्या मुख्य पदांचा उल्लेख नव्हता, ती केवळ एक कारकुनी चूक होती. या संदर्भात निवडणूक आयोगाला लवकरच एक नवीन पत्र पाठवून पटेल आणि तटकरे यांच्यासह पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांची स्पष्ट माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.



अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला काही तास उलटत नाहीत तोच पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे वृत्त आले आहे. याआधी शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची चर्चा झाल्याचे वृत्त आले. यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या पार्श्वभूमीवर अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. नंतर शनिवारी रात्री उशिरा पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे वृत्त आले आहे.



निवडणूक आयोगाला २९ एप्रिल रोजी पाठवलेल्या पत्रातील मजकूर जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीशी संबंधित घटनाक्रमाला वेग आला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी २९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. पत्रात नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मुख्य पदे गायब असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख 'राज्यसभेचे पक्षनेते' आणि सुनील तटकरे यांचा उल्लेख 'लोकसभेचे पक्षनेते' असा करण्यात आला होता. परंतु, त्यांच्या नावांसमोर 'राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष' आणि 'महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष' या त्यांच्या मूळ संघटनात्मक पदांचा उल्लेख नसल्यामुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांना पक्षात बाजूला केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. माध्यमांमधील वृत्तांचे खंडन करताना उमेश पाटील म्हणाले, "प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पदे आधीसारखीच कायम आहेत. निवडणूक आयोगाकडे गेलेल्या पत्रात केवळ तांत्रिक चूक झाली होती, ज्याचा प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ काढला. लवकरच नवे सुधारित पत्र आयोगाला पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.



आनंद परांजपे सिल्व्हर ओकवर


शिवसेना नेते आनंद परांजपे हे शरद पवार यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले आहेत. आनंद परांजपे हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते १४ वर्षे राष्ट्रवादीत होते. पण आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशानंतर पहिल्यांदाच आनंद परांजे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत.

Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम