Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानी संघ सध्या २०२५-२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्राचा भाग म्हणून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर आहे. पहिला सामना मिरपूरमध्ये खेळला गेला आणि त्यात पाकिस्तानी संघ १०४ धावांनी पराभूत झाला.



आता आयसीसीने मिरपूर कसोटीतील स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानी संघावर मोठी कारवाई केली असून, यामध्ये त्यांच्या सामना शुल्कावर दंड आकारण्यासोबतच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या गुणतालिकेतून त्यांचे गुणही मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. आधीच पाकिस्तान संघाची कसोटीत अवस्था बिकट असताना आयसीसीने केलेल्या या कारवाईचा संघाला मोठा फटका बसला आहे.



आयसीसीच्या पाकिस्तान संघाला ठोठावलेल्या दंडामधील अहवालात असं म्हटलं आहे की, मिरपूर स्टेडियममध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्यांनी निर्धारित वेळेपेक्षा आठ षटकं कमी टाकली. परिणामी, खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्काच्या ४० टक्के दंड आकारण्यात आला आणि कमी टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी एक गुण वजा करण्यात आला. यामुळे, पाकिस्तानी संघाने पराभवासाठी केवळ एक गुणच गमावला नाही, तर एकूण आठ गुण गमावले.
आयसीसीच्या या कारवाईनंतर आता, त्यांचे एकूण फक्त ४ गुण शिल्लक आहेत, ज्यामुळे पाकिस्तानी संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ गुणतालिकेत थेट ८व्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये केवळ वेस्ट इंडिज संघ त्यांच्या खाली आहे, ज्यांच्या गुणांची एकूण टक्केवारी ४.१७ आहे.


पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल आयसीसीने संघावर केलेली कारवाई स्वीकारली असून, या प्रकरणात आता कोणतीही पुढील औपचारिक सुनावणी होणार नाही.


मैदानातील पंच रिचर्ड केटलबरो आणि कुमार धर्मसेना, तसेच तिसरे पंच अलाउद्दीन पालेकर आणि चौथे पंच गाझी सोहेल यांनी पाकिस्तानी संघावर स्लो ओव्हर रेटसाठी आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर, सामनाधिकारी जेफ क्रो यांनी प्रकरण ऐकून दंडात्मक कारवाई केली. दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना १६ मेपासून सिल्हेट येथे खेळवला जात आहे.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)