Virat Kohil : विराट कोहलीचा बीसीसीआयला स्पष्ट संदेश; मला स्वतःला सिद्ध करावे लागणार असेल तर…..

The RCB Podcast - Life in Cricket : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्यास तयार आहे. पण त्याला संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयकडून विश्वास आणि सन्मानाच्या वागणुकची अपेक्षा आहे. भारतीय संघासाठी माझ्याकडून जे जे चांगले करणे शक्य आहे त्यासाठी मी तयार असल्याचे कोहली म्हणाला.


मी खेळेन, पण मला वारंवार माझी योग्यता सिद्ध करावी लागणार असेल तर खेळणे मला योग्य वाटत नाही. कोहलीच्या या वक्तव्याकडे अनेकजण बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाला दिलेला थेट इशारा म्हणून पाहत आहेत. कोहलीने अलीकडेच देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली. दोन सामन्यांत त्याने २०८ धावा करत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. या कामगिरीबाबत बोलताना कोहली म्हणाला की, मी ही स्पर्धा कोणाला काही सिद्ध करण्यासाठी खेळलो नाही. मी खेळलो कारण माझे क्रिकेटवर प्रेम आहे.



सध्या कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एकदिवसीय प्रकारात सक्रिय आहे. त्याने यापूर्वी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०२७ च्या विश्वचषकाबाबत बोलताना कोहली म्हणाला की, भारतासाठी विश्वचषक खेळणे ही मोठी गोष्ट आहे; मात्र त्यासाठी दोन्ही बाजूंनी स्पष्टता आणि विश्वास असणे गरजेचे आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीने आतापर्यंत ३११ सामन्यांत १४,७९७ धावा केल्या असून त्यात ५४ शतके आणि ७७ अर्धशतकांचा समावेश आहे.





नेमके प्रकरण काय?


गेल्या वर्षी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अचानक एकत्र कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर भारतीय संघात सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. सध्या दोघेही भारतासाठी केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत.२०२७ च्या विश्वचषकात त्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. काही अहवालांनुसार मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशी मतभेद असल्याचीही चर्चा आहे. मात्र या तिघांपैकी कोणीही याबाबत अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून दूर करण्यात आल्याची चर्चा देखील झाली होती. तसेच बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही या दोघांच्या भवितव्याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. मात्र कोहलीने केलेल्या विधानाने टीम इंडियामध्ये काही बरोबर नसल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईच्या संघात कुलदीप यादवची एन्ट्री तर RCB मध्येही मोठा बदल

चेन्नई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात प्लेऑफमध्ये कोणते संघ पोहोचणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

France Football : फ्रान्सचा वर्ल्ड कप संघ जाहीर; कीलीयन मबंप्पेला कर्णधारपद ,कोलो मुआनी संघाबाहेर

पॅरिस : आगामी 2026 FIFA World Cup साठी फ्रान्सने २६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. २०२२ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध

Ravi Shastri : 'हाच होणार भारताच्या T20 संघाचा कर्णधार'

मुंबई : भारताच्या टी २० संघाचा कर्णधार कोण होणार यावरून क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवचा

Kireon Pollard: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! कायरन पोलार्डवर BCCI ची कारवाई

IPL 2026 : यंदाच्या आयपीएलमधील ५८ व्या साखळी सामन्यात अर्थात लीग मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा पराभव केला.

CSK VS LSG : पंजाबच्या पराभवानंतर चेन्नईसमोर सुवर्णसंधी, आज लखनऊविरुद्ध निर्णायक लढत

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात महत्त्वाची लढत रंगणार आहे. हा

तिलक वर्मा चमकला, मुंबईने सामना जिंकला; पंजाबचा पाचवा पराभव

धरमशाला : आयपीएल २०२६ मधील ५८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ६ गडी