Ravi Shastri : 'हाच होणार भारताच्या T20 संघाचा कर्णधार'

मुंबई : भारताच्या टी २० संघाचा कर्णधार कोण होणार यावरून क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवचा हरवलेला फॉर्म बघून बीसीसीआयने नव्या टी २० कर्णधाराबाबत विचार सुरू केला आहे. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक भाकीत वर्तवले आहे. रवी शास्त्री यांनी भारताच्या T20 संघाचा कर्णधार कोण होणार ? या प्रश्नाचे उत्तर देत थेट खेळाडूचे नाव सांगितले आहे.



संजू सॅमसनच्या कामगिरीत सुधारणा होत असताना दिसत आहे. त्याची टी २० वर्ल्डकपमधील कामगिरी प्रभावी आहे. यंदाच्या आयपीएलमधील त्याची कामगिरी बघता तो भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदााठी प्रबळ दावेदार ठरू शकतो. संजू सॅमसन सध्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे, तो फलंदाजीसाठी सलामीलाच येत आहे. यंदाच्या हंगामात त्याने चेन्नईसाठी ११ सामन्यांत फलंदाजी करून ४३० धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. यंदा दिल्ली विरूद्धच्या सामन्यात त्याने नाबाद ११५ धावा केल्या. ही यंदाच्या आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यामुळे रवी शास्त्री यांनी संजू सॅमसन हाच भारताच्या T20 संघाचा कर्णधार होऊ शकतो असे भाकीत वर्तवले आहे. आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे भाकीत केले आहे.


भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर हा पण एक प्रमुख दावेदार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून १२ सामन्यात त्याने ३९६ धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.यंदाच्या गुणतालिकेत चेन्नई पाचव्या तर पंजाब चौथ्या स्थानी आहे. यामुळे बीसीसीआय आयपीएल पूर्ण झाल्यानंतरच भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदाबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.