Ravi Shastri : 'हाच होणार भारताच्या T20 संघाचा कर्णधार'

मुंबई : भारताच्या टी २० संघाचा कर्णधार कोण होणार यावरून क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवचा हरवलेला फॉर्म बघून बीसीसीआयने नव्या टी २० कर्णधाराबाबत विचार सुरू केला आहे. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक भाकीत वर्तवले आहे. रवी शास्त्री यांनी भारताच्या T20 संघाचा कर्णधार कोण होणार ? या प्रश्नाचे उत्तर देत थेट खेळाडूचे नाव सांगितले आहे.



संजू सॅमसनच्या कामगिरीत सुधारणा होत असताना दिसत आहे. त्याची टी २० वर्ल्डकपमधील कामगिरी प्रभावी आहे. यंदाच्या आयपीएलमधील त्याची कामगिरी बघता तो भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदााठी प्रबळ दावेदार ठरू शकतो. संजू सॅमसन सध्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे, तो फलंदाजीसाठी सलामीलाच येत आहे. यंदाच्या हंगामात त्याने चेन्नईसाठी ११ सामन्यांत फलंदाजी करून ४३० धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. यंदा दिल्ली विरूद्धच्या सामन्यात त्याने नाबाद ११५ धावा केल्या. ही यंदाच्या आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यामुळे रवी शास्त्री यांनी संजू सॅमसन हाच भारताच्या T20 संघाचा कर्णधार होऊ शकतो असे भाकीत वर्तवले आहे. आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे भाकीत केले आहे.


भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर हा पण एक प्रमुख दावेदार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून १२ सामन्यात त्याने ३९६ धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.यंदाच्या गुणतालिकेत चेन्नई पाचव्या तर पंजाब चौथ्या स्थानी आहे. यामुळे बीसीसीआय आयपीएल पूर्ण झाल्यानंतरच भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदाबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल; मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी आणि तपास यंत्रणांना नवी दिशा देण्यासाठी गृह विभागाने

महाराष्ट्र सरकारकडून विमान इंधनावरील 'व्हॅट'मध्ये ११ टक्क्यांची कपात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय; 'एटीएफ'वरील व्हॅट १८ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांवर मुंबई : पश्चिम

Minister Chhagan Bhujbal : दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर मुंबई : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने

State Government : व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारकडून नवे धोरण जाहीर

 कमी पटसंख्येच्या शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले मुंबई : राज्यातील शाळांच्या

Uddhav Thackeray Eknath Shinde : "आम्ही इथे रिकामे बसलो नाही, नेत्यांना आवरा!" 'त्या' एका विनंतीने खंडपीठाची ठाकरे गटाला चपराक

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या अत्यंत

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

कर्जमाफी, शेतकरी मदत आणि ‘लखपती दीदी’ अभियानालाही वेग देणार सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या