Ravi Shastri : 'हाच होणार भारताच्या T20 संघाचा कर्णधार'

मुंबई : भारताच्या टी २० संघाचा कर्णधार कोण होणार यावरून क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवचा हरवलेला फॉर्म बघून बीसीसीआयने नव्या टी २० कर्णधाराबाबत विचार सुरू केला आहे. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक भाकीत वर्तवले आहे. रवी शास्त्री यांनी भारताच्या T20 संघाचा कर्णधार कोण होणार ? या प्रश्नाचे उत्तर देत थेट खेळाडूचे नाव सांगितले आहे.



संजू सॅमसनच्या कामगिरीत सुधारणा होत असताना दिसत आहे. त्याची टी २० वर्ल्डकपमधील कामगिरी प्रभावी आहे. यंदाच्या आयपीएलमधील त्याची कामगिरी बघता तो भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदााठी प्रबळ दावेदार ठरू शकतो. संजू सॅमसन सध्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे, तो फलंदाजीसाठी सलामीलाच येत आहे. यंदाच्या हंगामात त्याने चेन्नईसाठी ११ सामन्यांत फलंदाजी करून ४३० धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. यंदा दिल्ली विरूद्धच्या सामन्यात त्याने नाबाद ११५ धावा केल्या. ही यंदाच्या आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यामुळे रवी शास्त्री यांनी संजू सॅमसन हाच भारताच्या T20 संघाचा कर्णधार होऊ शकतो असे भाकीत वर्तवले आहे. आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे भाकीत केले आहे.


भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर हा पण एक प्रमुख दावेदार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून १२ सामन्यात त्याने ३९६ धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.यंदाच्या गुणतालिकेत चेन्नई पाचव्या तर पंजाब चौथ्या स्थानी आहे. यामुळे बीसीसीआय आयपीएल पूर्ण झाल्यानंतरच भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदाबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य